शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:11 IST

पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।या न्यायाप्रमाणे बालपणी आमचे मामा वै. कचेश्वर महाराज वडगुले मांडवडकर यांनी आळंदी सिद्धबेटात वै. गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे वारकरी शिक्षणासाठी योग आला. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील आनंद व वारीची ओढ मनात घर करून बसली. मग ...

पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।या न्यायाप्रमाणे बालपणी आमचे मामा वै. कचेश्वर महाराज वडगुले मांडवडकर यांनी आळंदी सिद्धबेटात वै. गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे वारकरी शिक्षणासाठी योग आला. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील आनंद व वारीची ओढ मनात घर करून बसली. मग काही वर्ष संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुभवता आला. मागील वर्षी संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात व याअगोदरही १२ वर्ष वारीचा अविस्मरणीय अनुभव जवळून घेतला. वारकरी संप्रदायाने दिंडी वारी, यात्रा अशा सामूहिक उपासनेवर प्रतिज्ञाबद्ध होऊन कटाक्षाने भर दिलेला आहे. त्यामागे व्यक्ती-समाज-धर्म यातील परस्पर संबंधाचा विपूल मानस शास्त्रीय आशय असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता दिसून येते. समाजाची परिवर्तनशीलता व धर्माची गतिमानता या विषयीचे साक्षेपी अवलोकन करण्याची दुर्मिळ संधी अशा सामूहिक दिंडी सोहळ्यातून व पंढरीच्या वारीतून मिळते. प्रपंचात व्यवस्था असते पण वारीमध्ये सुखानुभूतीची अवस्था प्राप्त होते म्हणून पंढरीची वारीची ओढ असते. वारीमध्ये प्रेम, त्याग, सेवा, विश्वबंधुत्व अशा थोर सद्गुणांची शिकवण व जोपासना घडविण्याचे सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे, यामुळे दिवसेंदिवस वारीची अभिवृद्धी होताना दिसते, कारण वारी नुसती प्रथा नाही तर ती संत परंपरा आहे. वारीमध्ये सद्गुणाचे शिक्षण, शिकवण व संस्कार आपोआप होतात. ही भक्तीप्रेमाची ऊर्जा पुढील वारीपर्यंत टिकते. नामस्मरणाची गोडी वारीतच वाढते. ज्ञान, प्रेम, भक्तीने माणसं वारीतच जोडायची असतात, याकरिता प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची वारी करावी.पंढरीची वारी चार प्रकारची आहे. सकाम वारी- मायिक फलप्राप्तीसाठी, विधीची वारी- वाडवडिलांच्या आज्ञापालनार्थ, निष्कामवारी- मोक्षासाठी, आवडीची वारी- जीवनमुक्तीचे विलक्षण सुख प्राप्तीकरिता आहे.आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक हे तीन ताप अंत:करणाला सोडूनगेल्यावरच सुख-शांती लाभते, तसे काम, क्र ोध, लोभ हे तीन विकार नष्ट झाल्यावरच मोक्ष मिळतो. हे सर्व संतांची संगत, नामस्मरण, भजन, कीर्तन, पायी दिंडी, तीर्थस्नान, देवाचे दर्शनाने घडते.‘संत संगे चालता दिंडी ।पाप कर्मा पडे खिंडी ।।पंढरीचे वारकरी ।ते अधिकारी मोक्षाचे ।।’अण्णासाहेब महाराज आहेर(जिल्हाध्यक्ष- अखिल भारतीयवारकरी मंडळ, नाशिक)

टॅग्स :Nashikनाशिक