शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:11 IST

पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।या न्यायाप्रमाणे बालपणी आमचे मामा वै. कचेश्वर महाराज वडगुले मांडवडकर यांनी आळंदी सिद्धबेटात वै. गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे वारकरी शिक्षणासाठी योग आला. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील आनंद व वारीची ओढ मनात घर करून बसली. मग ...

पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।या न्यायाप्रमाणे बालपणी आमचे मामा वै. कचेश्वर महाराज वडगुले मांडवडकर यांनी आळंदी सिद्धबेटात वै. गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे वारकरी शिक्षणासाठी योग आला. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील आनंद व वारीची ओढ मनात घर करून बसली. मग काही वर्ष संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुभवता आला. मागील वर्षी संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात व याअगोदरही १२ वर्ष वारीचा अविस्मरणीय अनुभव जवळून घेतला. वारकरी संप्रदायाने दिंडी वारी, यात्रा अशा सामूहिक उपासनेवर प्रतिज्ञाबद्ध होऊन कटाक्षाने भर दिलेला आहे. त्यामागे व्यक्ती-समाज-धर्म यातील परस्पर संबंधाचा विपूल मानस शास्त्रीय आशय असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता दिसून येते. समाजाची परिवर्तनशीलता व धर्माची गतिमानता या विषयीचे साक्षेपी अवलोकन करण्याची दुर्मिळ संधी अशा सामूहिक दिंडी सोहळ्यातून व पंढरीच्या वारीतून मिळते. प्रपंचात व्यवस्था असते पण वारीमध्ये सुखानुभूतीची अवस्था प्राप्त होते म्हणून पंढरीची वारीची ओढ असते. वारीमध्ये प्रेम, त्याग, सेवा, विश्वबंधुत्व अशा थोर सद्गुणांची शिकवण व जोपासना घडविण्याचे सामर्थ्य पंढरीच्या वारीत आहे, यामुळे दिवसेंदिवस वारीची अभिवृद्धी होताना दिसते, कारण वारी नुसती प्रथा नाही तर ती संत परंपरा आहे. वारीमध्ये सद्गुणाचे शिक्षण, शिकवण व संस्कार आपोआप होतात. ही भक्तीप्रेमाची ऊर्जा पुढील वारीपर्यंत टिकते. नामस्मरणाची गोडी वारीतच वाढते. ज्ञान, प्रेम, भक्तीने माणसं वारीतच जोडायची असतात, याकरिता प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची वारी करावी.पंढरीची वारी चार प्रकारची आहे. सकाम वारी- मायिक फलप्राप्तीसाठी, विधीची वारी- वाडवडिलांच्या आज्ञापालनार्थ, निष्कामवारी- मोक्षासाठी, आवडीची वारी- जीवनमुक्तीचे विलक्षण सुख प्राप्तीकरिता आहे.आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक हे तीन ताप अंत:करणाला सोडूनगेल्यावरच सुख-शांती लाभते, तसे काम, क्र ोध, लोभ हे तीन विकार नष्ट झाल्यावरच मोक्ष मिळतो. हे सर्व संतांची संगत, नामस्मरण, भजन, कीर्तन, पायी दिंडी, तीर्थस्नान, देवाचे दर्शनाने घडते.‘संत संगे चालता दिंडी ।पाप कर्मा पडे खिंडी ।।पंढरीचे वारकरी ।ते अधिकारी मोक्षाचे ।।’अण्णासाहेब महाराज आहेर(जिल्हाध्यक्ष- अखिल भारतीयवारकरी मंडळ, नाशिक)

टॅग्स :Nashikनाशिक