शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:43 IST

पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.

पंचवटी : पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.ऐन पावसाळ्यात वाडे तसेच धोकादायक इमारतींचा भाग कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी होते व धोकादायक वाड्यांचा किंवा इमारतींचा जीर्ण भाग उतरविण्याचे काम करून वराती मागे घोडे याप्रमाणे करत असल्याचे दिसून येत आहे.पंचवटी परिसरात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात जवळपास तीन इमारतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांत पहिली घटना (दि.५) सुकेणकर लेन येथे घडली. परिसरात ४० ते ४५ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या श्रीराम अपार्टमेंटचा जिना जीर्ण झाल्याने तो कोसळला होता या घटनेत दोनजण जखमी झाले होते, तर दोन ते तीन दिवसांनी मखमलाबाद नाक्यावर असलेल्या हेमकुंजजवळील हर्षवर्धन सोसायटीची तीन मजली इमारत (दि.८) मध्यरात्री कोसळली होती. त्यानंतर रविवारी (दि.२८) दुपारी शनिचौकातील पवार वाड्याची भिंत कोसळून दोघे बहीण-भाऊ जखमी झाले होते. सदर तिन्ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाड्यातील तसेच इमारतीतील रहिवासीयांना तत्काळ घटनास्थळाहून सुरक्षितस्थळी हटवून त्यांची अन्यत्र मनपाच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती.दरवर्षी पावसाळ्यात एखाद्या वाडा किंवा धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रशासन घटनास्थळी जाऊन उरलेला धोकादायक भाग उतरवून घेण्याची कार्यवाही करते, मात्र हीच तत्परता प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी दाखवून किंवा धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर लागलीच कारवाई केली तर जुने वाडे तसेच इमारतींचा भाग पावसाळ्यात कोसळून जखमी होण्याची घटना टाळता तर येईलच शिवाय पावसाळ्यापूर्वी धोकादायक भाग उतरवून घेतला तर पावसाळ्यात पडझड होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.प्रशासनाची उदासीनताप्रशासन दरवेळी उदासीनता दाखविते पावसाळ्यात केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडते. नोटिसा बजावल्यानंतर त्या धोकादायक वाडे किंवा घरांचा भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही किंवा दखल घेत नाही हे दिसून येते त्यामुळे पावसाळ्यात इमारतीचा भाग कोसळल्यावर प्रशासन वराती मागून घोडे याप्रमाणे धोकादायक भाग उतरविण्याचे काम करते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर