शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:43 IST

पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.

पंचवटी : पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.ऐन पावसाळ्यात वाडे तसेच धोकादायक इमारतींचा भाग कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी होते व धोकादायक वाड्यांचा किंवा इमारतींचा जीर्ण भाग उतरविण्याचे काम करून वराती मागे घोडे याप्रमाणे करत असल्याचे दिसून येत आहे.पंचवटी परिसरात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात जवळपास तीन इमारतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांत पहिली घटना (दि.५) सुकेणकर लेन येथे घडली. परिसरात ४० ते ४५ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या श्रीराम अपार्टमेंटचा जिना जीर्ण झाल्याने तो कोसळला होता या घटनेत दोनजण जखमी झाले होते, तर दोन ते तीन दिवसांनी मखमलाबाद नाक्यावर असलेल्या हेमकुंजजवळील हर्षवर्धन सोसायटीची तीन मजली इमारत (दि.८) मध्यरात्री कोसळली होती. त्यानंतर रविवारी (दि.२८) दुपारी शनिचौकातील पवार वाड्याची भिंत कोसळून दोघे बहीण-भाऊ जखमी झाले होते. सदर तिन्ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाड्यातील तसेच इमारतीतील रहिवासीयांना तत्काळ घटनास्थळाहून सुरक्षितस्थळी हटवून त्यांची अन्यत्र मनपाच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती.दरवर्षी पावसाळ्यात एखाद्या वाडा किंवा धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रशासन घटनास्थळी जाऊन उरलेला धोकादायक भाग उतरवून घेण्याची कार्यवाही करते, मात्र हीच तत्परता प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी दाखवून किंवा धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर लागलीच कारवाई केली तर जुने वाडे तसेच इमारतींचा भाग पावसाळ्यात कोसळून जखमी होण्याची घटना टाळता तर येईलच शिवाय पावसाळ्यापूर्वी धोकादायक भाग उतरवून घेतला तर पावसाळ्यात पडझड होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.प्रशासनाची उदासीनताप्रशासन दरवेळी उदासीनता दाखविते पावसाळ्यात केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडते. नोटिसा बजावल्यानंतर त्या धोकादायक वाडे किंवा घरांचा भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही किंवा दखल घेत नाही हे दिसून येते त्यामुळे पावसाळ्यात इमारतीचा भाग कोसळल्यावर प्रशासन वराती मागून घोडे याप्रमाणे धोकादायक भाग उतरविण्याचे काम करते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर