शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
4
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
5
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
6
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
7
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
8
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
9
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
10
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
11
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
13
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
14
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
15
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
16
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
17
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
18
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
19
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
20
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:43 IST

पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.

पंचवटी : पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.ऐन पावसाळ्यात वाडे तसेच धोकादायक इमारतींचा भाग कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी होते व धोकादायक वाड्यांचा किंवा इमारतींचा जीर्ण भाग उतरविण्याचे काम करून वराती मागे घोडे याप्रमाणे करत असल्याचे दिसून येत आहे.पंचवटी परिसरात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात जवळपास तीन इमारतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांत पहिली घटना (दि.५) सुकेणकर लेन येथे घडली. परिसरात ४० ते ४५ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या श्रीराम अपार्टमेंटचा जिना जीर्ण झाल्याने तो कोसळला होता या घटनेत दोनजण जखमी झाले होते, तर दोन ते तीन दिवसांनी मखमलाबाद नाक्यावर असलेल्या हेमकुंजजवळील हर्षवर्धन सोसायटीची तीन मजली इमारत (दि.८) मध्यरात्री कोसळली होती. त्यानंतर रविवारी (दि.२८) दुपारी शनिचौकातील पवार वाड्याची भिंत कोसळून दोघे बहीण-भाऊ जखमी झाले होते. सदर तिन्ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाड्यातील तसेच इमारतीतील रहिवासीयांना तत्काळ घटनास्थळाहून सुरक्षितस्थळी हटवून त्यांची अन्यत्र मनपाच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती.दरवर्षी पावसाळ्यात एखाद्या वाडा किंवा धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रशासन घटनास्थळी जाऊन उरलेला धोकादायक भाग उतरवून घेण्याची कार्यवाही करते, मात्र हीच तत्परता प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी दाखवून किंवा धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर लागलीच कारवाई केली तर जुने वाडे तसेच इमारतींचा भाग पावसाळ्यात कोसळून जखमी होण्याची घटना टाळता तर येईलच शिवाय पावसाळ्यापूर्वी धोकादायक भाग उतरवून घेतला तर पावसाळ्यात पडझड होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.प्रशासनाची उदासीनताप्रशासन दरवेळी उदासीनता दाखविते पावसाळ्यात केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडते. नोटिसा बजावल्यानंतर त्या धोकादायक वाडे किंवा घरांचा भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही किंवा दखल घेत नाही हे दिसून येते त्यामुळे पावसाळ्यात इमारतीचा भाग कोसळल्यावर प्रशासन वराती मागून घोडे याप्रमाणे धोकादायक भाग उतरविण्याचे काम करते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर