शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पंचवटी : फुलेनगरला हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 17:21 IST

कामगारांनी जेसीबीद्वारे केवळ उडणारा कारंजा मातीच्या भरावाने दाबला परंतू वाया जाणारे पिण्याचे शेकडो लिटर पाणी त्यांना रोखता आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ठळक मुद्देबाळगोपाळांनी कारंजाचे तुषार अंगावर झेलत मनमुराद आनंद लुटला. जेसीबीद्वारे केवळ उडणारा कारंजा मातीच्या भरावाने दाबला

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी विभागातील फुलेनगर येथील मेरीच्या कार्यालयाजवळ असलेली भूमिगत जलवाहिनी अचानकपणे फुटल्याने पाण्याचा कारंजा सोमवारी (दि.१६) दुपारी अधिकच उंच उडत होता. यावेळी मनपाच्या संबंधित ठेकेदाराच्या कामगारांनी जेसीबीसह या ठिकाणी हजेरी तर लावली; मात्र जलवाहिनीची दुरूस्ती न करता केवळ पाण्याचा कारंजा बंद व्हावा, यासाठी जेसीबीने मातीचा भराव त्यावर टाकून काढता पाय घेतला.महापालिका प्रशासनाला जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच याठिकाणी जेसीबीसह कामगार हजर झाल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला की जलवाहिनीची आता तत्काळ दुरूस्ती होईल आणि पाण्याचा अपव्यय थांबेल; मात्र कामगारांनी जेसीबीद्वारे केवळ उडणारा कारंजा मातीच्या भरावाने दाबला परंतू वाया जाणारे पिण्याचे शेकडो लिटर पाणी त्यांना रोखता आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

फुलेनगर झोपडपट्टीच्या अगदी जवळच जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे परिसरातील महिलावर्गाने धुणीभांडी तसेच रिक्षाचालकांनी रिक्षा व दुचाकीदेखील या कारंजाखाली स्वच्छ करून घेतल्या तर बाळगोपाळांनी कारंजाचे तुषार अंगावर झेलत ओलेचिंब होऊन नाचण्याचा मनमुराद आनंदही लुटला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र याकडे कानाडोळा करणे पसंत केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची दुरूस्तीचे काम हाती का घेण्यात आले नाही? असा प्रश्न यावेळी नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी