शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:40 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

नाशिकरोड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.मुंबई-ठाणे परिसरात शनिवार-रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होऊन रेल्वे वेळापत्रक कोलमडून गेले होते. मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबई-नाशिक दरम्यान रेल्वे धावूशकली नाही. कोलमडलेले रेल्वे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी सोमवारी मनमाडहून मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस, अप-डाउनची मुंबई भुसावळ पॅसेंजर, इगतपुरी-मनमाड शटल रद्द करण्यात आली होती. गोदावरी एक्स्प्रेस ही सोमवारी आपल्या निर्धारित वेळेत मुंबईकडे रवाना झाली.रविवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आलेली गोरखपूर एक्स्प्रेस सोमवारी सकाळी नाशिकरोडहून पुन्हा गोरखपूरला रवाना करण्यात आली. मुंबईहून येणाºया वाराणसी, गीतांजली, तपोवन, हरिद्वार, बरेली, पुष्पक या रेल्वे सोमवारी रद्द करण्यात आल्या होत्या.सोमवारी सकाळी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, मुंबई - काजीपेठ एक्स्प्रेस या दोन रेल्वे आपल्या निर्धारित वेळेतच धावल्या.रविवारी मुंबईला जाणाºया पठाणकोट, पवन एक्स्प्रेस, वाराणसी, दुरांतो एक्स्प्रेस दहा ते पंधरा तास उशिराने मुंबईला रवाना झाल्या. कोलमडून गेलेले रेल्वेचे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरी बहुतांश रेल्वे उशिराने धावत असल्याने, काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.शहर बसेसवा पूर्ववतमुसळधार पावसामुळे शहरातील पुलांवरून पाणी वाहत असल्याने रविवारी दुपारनंतर बंद करण्यात आलेल्या शहर बसेस दुपारनंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. दिवसभर सुरू असलेली संततधार तसेच नदीला आलेल्या पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बंद करण्यात आलेल्या बसेस सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर पूर्ववत करण्यात आल्या.४रविवारी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील अनेक लहान-मोठ्या पुलांना पाणी लागल्यामुळे तर काही मार्ग खचल्यामुळे पेठ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसgodavariगोदावरीcentral railwayमध्य रेल्वे