शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:40 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

नाशिकरोड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.मुंबई-ठाणे परिसरात शनिवार-रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होऊन रेल्वे वेळापत्रक कोलमडून गेले होते. मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबई-नाशिक दरम्यान रेल्वे धावूशकली नाही. कोलमडलेले रेल्वे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी सोमवारी मनमाडहून मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस, अप-डाउनची मुंबई भुसावळ पॅसेंजर, इगतपुरी-मनमाड शटल रद्द करण्यात आली होती. गोदावरी एक्स्प्रेस ही सोमवारी आपल्या निर्धारित वेळेत मुंबईकडे रवाना झाली.रविवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आलेली गोरखपूर एक्स्प्रेस सोमवारी सकाळी नाशिकरोडहून पुन्हा गोरखपूरला रवाना करण्यात आली. मुंबईहून येणाºया वाराणसी, गीतांजली, तपोवन, हरिद्वार, बरेली, पुष्पक या रेल्वे सोमवारी रद्द करण्यात आल्या होत्या.सोमवारी सकाळी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, मुंबई - काजीपेठ एक्स्प्रेस या दोन रेल्वे आपल्या निर्धारित वेळेतच धावल्या.रविवारी मुंबईला जाणाºया पठाणकोट, पवन एक्स्प्रेस, वाराणसी, दुरांतो एक्स्प्रेस दहा ते पंधरा तास उशिराने मुंबईला रवाना झाल्या. कोलमडून गेलेले रेल्वेचे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरी बहुतांश रेल्वे उशिराने धावत असल्याने, काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.शहर बसेसवा पूर्ववतमुसळधार पावसामुळे शहरातील पुलांवरून पाणी वाहत असल्याने रविवारी दुपारनंतर बंद करण्यात आलेल्या शहर बसेस दुपारनंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. दिवसभर सुरू असलेली संततधार तसेच नदीला आलेल्या पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बंद करण्यात आलेल्या बसेस सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर पूर्ववत करण्यात आल्या.४रविवारी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील अनेक लहान-मोठ्या पुलांना पाणी लागल्यामुळे तर काही मार्ग खचल्यामुळे पेठ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसgodavariगोदावरीcentral railwayमध्य रेल्वे