शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:40 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

नाशिकरोड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.मुंबई-ठाणे परिसरात शनिवार-रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होऊन रेल्वे वेळापत्रक कोलमडून गेले होते. मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबई-नाशिक दरम्यान रेल्वे धावूशकली नाही. कोलमडलेले रेल्वे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी सोमवारी मनमाडहून मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस, अप-डाउनची मुंबई भुसावळ पॅसेंजर, इगतपुरी-मनमाड शटल रद्द करण्यात आली होती. गोदावरी एक्स्प्रेस ही सोमवारी आपल्या निर्धारित वेळेत मुंबईकडे रवाना झाली.रविवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आलेली गोरखपूर एक्स्प्रेस सोमवारी सकाळी नाशिकरोडहून पुन्हा गोरखपूरला रवाना करण्यात आली. मुंबईहून येणाºया वाराणसी, गीतांजली, तपोवन, हरिद्वार, बरेली, पुष्पक या रेल्वे सोमवारी रद्द करण्यात आल्या होत्या.सोमवारी सकाळी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, मुंबई - काजीपेठ एक्स्प्रेस या दोन रेल्वे आपल्या निर्धारित वेळेतच धावल्या.रविवारी मुंबईला जाणाºया पठाणकोट, पवन एक्स्प्रेस, वाराणसी, दुरांतो एक्स्प्रेस दहा ते पंधरा तास उशिराने मुंबईला रवाना झाल्या. कोलमडून गेलेले रेल्वेचे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरी बहुतांश रेल्वे उशिराने धावत असल्याने, काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.शहर बसेसवा पूर्ववतमुसळधार पावसामुळे शहरातील पुलांवरून पाणी वाहत असल्याने रविवारी दुपारनंतर बंद करण्यात आलेल्या शहर बसेस दुपारनंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. दिवसभर सुरू असलेली संततधार तसेच नदीला आलेल्या पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बंद करण्यात आलेल्या बसेस सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर पूर्ववत करण्यात आल्या.४रविवारी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील अनेक लहान-मोठ्या पुलांना पाणी लागल्यामुळे तर काही मार्ग खचल्यामुळे पेठ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसgodavariगोदावरीcentral railwayमध्य रेल्वे