शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पंचवटी, राज्यराणी तीन दिवस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 01:33 IST

मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटलीपुत्र, मुंबईहून जाणारी भागलपूर रेल्वेगाडी मंगळवारीदेखील रद्द करण्यात आली होती.

ठळक मुद्देरेल्वे रूळ दुरुस्तीचे काम : येत्या शनिवारपासून मंगळवारपर्यंत ब्रेक

नाशिक रोड : मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटलीपुत्र, मुंबईहून जाणारी भागलपूर रेल्वेगाडी मंगळवारीदेखील रद्द करण्यात आली होती.

मनमाड-मुंबई रोज येणारी-जाणारी नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी शनिवार (दि. २५) जूनपासून ते मंगळवार २८ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईला जाताना पंचवटी सुरू आहे. मात्र, या दिवशी मुंबईहून नाशिकला येताना ती रद्द करण्यात आली आहे. जनशताब्दीदेखील या काळात बंद राहील.

मुंबईला जाणारी नंदीग्राम २६ आणि २७ जूनला, तर मुंबईहून सुटणारी २७ आणि २८ जूनला, नांदेडहून मुंबईला जाणारी राज्यराणी २६ आणि २७ जूनला; तर मुंबईहून नांदेडला जाणारी राज्यराणी २७ आणि २८ जूनला रद्द आहे. मात्र दरम्यान पंचवटी नाशिकला पाणी भरण्याची सुविधा आहे. चार नंबरचा प्लॅटफॉर्म खाली राहत असल्याने गाडी कोठे उभी करायची, हा प्रश्नही निकाली निघतो. त्यामुळे पंचवटी नाशिकरोडहून सोडावी, अशी मागणी मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे, संजय शिंदे, रमेश फुलमाळी, सुदाम शिंदे, दीपक कोरगावकर, दत्ताराम गोसावी, उज्ज्वला कोल्हे, आदींनी केली आहे. पंचवटी रद्द केल्याने चार दिवस चाकरमाने, व्यावसायिक, व्यापारी, अधिकारी, कामगार, विद्यार्थी यांनी मुंबई व ठाण्याला दररोजप्रमाणे जायचे व यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे