शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पंचवटी, राज्यराणी तीन दिवस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 01:33 IST

मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटलीपुत्र, मुंबईहून जाणारी भागलपूर रेल्वेगाडी मंगळवारीदेखील रद्द करण्यात आली होती.

ठळक मुद्देरेल्वे रूळ दुरुस्तीचे काम : येत्या शनिवारपासून मंगळवारपर्यंत ब्रेक

नाशिक रोड : मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटलीपुत्र, मुंबईहून जाणारी भागलपूर रेल्वेगाडी मंगळवारीदेखील रद्द करण्यात आली होती.

मनमाड-मुंबई रोज येणारी-जाणारी नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी शनिवार (दि. २५) जूनपासून ते मंगळवार २८ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईला जाताना पंचवटी सुरू आहे. मात्र, या दिवशी मुंबईहून नाशिकला येताना ती रद्द करण्यात आली आहे. जनशताब्दीदेखील या काळात बंद राहील.

मुंबईला जाणारी नंदीग्राम २६ आणि २७ जूनला, तर मुंबईहून सुटणारी २७ आणि २८ जूनला, नांदेडहून मुंबईला जाणारी राज्यराणी २६ आणि २७ जूनला; तर मुंबईहून नांदेडला जाणारी राज्यराणी २७ आणि २८ जूनला रद्द आहे. मात्र दरम्यान पंचवटी नाशिकला पाणी भरण्याची सुविधा आहे. चार नंबरचा प्लॅटफॉर्म खाली राहत असल्याने गाडी कोठे उभी करायची, हा प्रश्नही निकाली निघतो. त्यामुळे पंचवटी नाशिकरोडहून सोडावी, अशी मागणी मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे, संजय शिंदे, रमेश फुलमाळी, सुदाम शिंदे, दीपक कोरगावकर, दत्ताराम गोसावी, उज्ज्वला कोल्हे, आदींनी केली आहे. पंचवटी रद्द केल्याने चार दिवस चाकरमाने, व्यावसायिक, व्यापारी, अधिकारी, कामगार, विद्यार्थी यांनी मुंबई व ठाण्याला दररोजप्रमाणे जायचे व यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे