शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

पंचांगकर्ते म्हणतात, जुलैपर्यंत गहिरे जलसंकट

By admin | Updated: March 15, 2016 00:10 IST

चार नक्षत्रांतच वृष्टी : यंदाही कशीबशी गाठणार पावसाची सरासरी

नाशिक : वेधशाळेने यंदा पर्जन्यमान सरासरी गाठणार असल्याचा अंदाज वर्तवित दिलासा देण्याचा प्रयत्न केला; परंतु दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात जुलैपर्यंत जलसंकट गहिरे होत जाणार असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविले आहे. पंचागकर्त्यांच्या मते पहिल्या चारही नक्षत्रात मध्यम पाऊसमान राहणार असून आश्लेषा, मघा या नक्षत्रांमध्ये दमदार पावसाचा तर पूर्वा आणि हस्त या नक्षत्रांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार नाहीच शिवाय पाऊस कशीबशी सरासरी गाठेल, असे भाकीतही केले आहे. त्यामुळे पंचांगकर्त्यांनीही आता नागरिकांना पाणीबचतीचा मौलिक सल्ला दिला आहे. धरणांमधील घटत चाललेला पाणीसाठा, आटलेले जलस्त्रोत यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ग्रामीण भागाबरोबरच यंदा प्रथमच नागरी भागालाही जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांत दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध धरणांतील पाणीसाठ्याचे जुलैअखेरपर्यंत नियोजन करण्यात आलेले आहे. या जलसंकटाचा सामना केला जात असतानाच भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळांसह काही विदेशी संस्थांनी यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहे. परंतु, पंचांगकर्त्यांनी यंदा पाऊस कशीबशी सरासरी गाठणार असल्याचा आणि पावसाच्या नक्षत्रांपैकी केवळ ३ ते ४ नक्षत्रांतच चांगला पाऊस होण्याचा अंदाज बांधला आहे. दाते पंचांगानुसार यंदा मृग, आर्द्रा, पुनर्वसू आणि पुष्य या पहिल्या चार नक्षत्रांत पाऊसमान मध्यम राहणार आहे. मृग नक्षत्रात पावसाचा अंदाज हुलकावण्या देणारा तर आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात मध्यम पाऊस राहणार आहे. पुष्य नक्षत्रात उष्णतामानातील फेरफारामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी खंडित पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.