शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पंचांगकर्ते म्हणतात, जुलैपर्यंत गहिरे जलसंकट

By admin | Updated: March 15, 2016 00:10 IST

चार नक्षत्रांतच वृष्टी : यंदाही कशीबशी गाठणार पावसाची सरासरी

नाशिक : वेधशाळेने यंदा पर्जन्यमान सरासरी गाठणार असल्याचा अंदाज वर्तवित दिलासा देण्याचा प्रयत्न केला; परंतु दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात जुलैपर्यंत जलसंकट गहिरे होत जाणार असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविले आहे. पंचागकर्त्यांच्या मते पहिल्या चारही नक्षत्रात मध्यम पाऊसमान राहणार असून आश्लेषा, मघा या नक्षत्रांमध्ये दमदार पावसाचा तर पूर्वा आणि हस्त या नक्षत्रांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार नाहीच शिवाय पाऊस कशीबशी सरासरी गाठेल, असे भाकीतही केले आहे. त्यामुळे पंचांगकर्त्यांनीही आता नागरिकांना पाणीबचतीचा मौलिक सल्ला दिला आहे. धरणांमधील घटत चाललेला पाणीसाठा, आटलेले जलस्त्रोत यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ग्रामीण भागाबरोबरच यंदा प्रथमच नागरी भागालाही जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांत दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध धरणांतील पाणीसाठ्याचे जुलैअखेरपर्यंत नियोजन करण्यात आलेले आहे. या जलसंकटाचा सामना केला जात असतानाच भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळांसह काही विदेशी संस्थांनी यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहे. परंतु, पंचांगकर्त्यांनी यंदा पाऊस कशीबशी सरासरी गाठणार असल्याचा आणि पावसाच्या नक्षत्रांपैकी केवळ ३ ते ४ नक्षत्रांतच चांगला पाऊस होण्याचा अंदाज बांधला आहे. दाते पंचांगानुसार यंदा मृग, आर्द्रा, पुनर्वसू आणि पुष्य या पहिल्या चार नक्षत्रांत पाऊसमान मध्यम राहणार आहे. मृग नक्षत्रात पावसाचा अंदाज हुलकावण्या देणारा तर आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात मध्यम पाऊस राहणार आहे. पुष्य नक्षत्रात उष्णतामानातील फेरफारामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी खंडित पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.