शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पंचांगकर्ते म्हणतात, जुलैपर्यंत गहिरे जलसंकट

By admin | Updated: March 15, 2016 00:10 IST

चार नक्षत्रांतच वृष्टी : यंदाही कशीबशी गाठणार पावसाची सरासरी

नाशिक : वेधशाळेने यंदा पर्जन्यमान सरासरी गाठणार असल्याचा अंदाज वर्तवित दिलासा देण्याचा प्रयत्न केला; परंतु दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात जुलैपर्यंत जलसंकट गहिरे होत जाणार असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविले आहे. पंचागकर्त्यांच्या मते पहिल्या चारही नक्षत्रात मध्यम पाऊसमान राहणार असून आश्लेषा, मघा या नक्षत्रांमध्ये दमदार पावसाचा तर पूर्वा आणि हस्त या नक्षत्रांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार नाहीच शिवाय पाऊस कशीबशी सरासरी गाठेल, असे भाकीतही केले आहे. त्यामुळे पंचांगकर्त्यांनीही आता नागरिकांना पाणीबचतीचा मौलिक सल्ला दिला आहे. धरणांमधील घटत चाललेला पाणीसाठा, आटलेले जलस्त्रोत यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ग्रामीण भागाबरोबरच यंदा प्रथमच नागरी भागालाही जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांत दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध धरणांतील पाणीसाठ्याचे जुलैअखेरपर्यंत नियोजन करण्यात आलेले आहे. या जलसंकटाचा सामना केला जात असतानाच भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळांसह काही विदेशी संस्थांनी यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहे. परंतु, पंचांगकर्त्यांनी यंदा पाऊस कशीबशी सरासरी गाठणार असल्याचा आणि पावसाच्या नक्षत्रांपैकी केवळ ३ ते ४ नक्षत्रांतच चांगला पाऊस होण्याचा अंदाज बांधला आहे. दाते पंचांगानुसार यंदा मृग, आर्द्रा, पुनर्वसू आणि पुष्य या पहिल्या चार नक्षत्रांत पाऊसमान मध्यम राहणार आहे. मृग नक्षत्रात पावसाचा अंदाज हुलकावण्या देणारा तर आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात मध्यम पाऊस राहणार आहे. पुष्य नक्षत्रात उष्णतामानातील फेरफारामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी खंडित पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.