शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पालखी हेलिकॉप्टर की बसमधून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:07 IST

नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. ...

ठळक मुद्देनिर्णय अद्यापही प्रलंबित : एसटी महामंडळ प्रक्रियेपासून अनभिज्ञ

नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पालखी घेऊन जाण्याची संस्थानची मानसिकता असताना जिल्हा प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही, तर उपमुख्यमंत्र्यांनी सुचविलेला हेलिकॉप्टरचा पर्यायही अंमलात येणे अशक्य असल्याने काहीशी निश्चितता निर्माण झालेली आहे.आषाढी एकादशीच्या यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने यंदा काही ठिकाणाहून पालख्या कशा निघणार या विषयची चर्चा सुरू झाली आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपायोजना करण्यात येत आहेत; त्याअनुषंगांना दोन बैठकादेखील मंत्रालयीन पातळीवर पार पडल्या आहेत. पालखी सोहळ्याला वारकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता पालखी शिवशाही बसमधून काढण्याचा पर्याय समोर आलेला आहे. मात्र बसमधून पालखी घेऊन जाताना भाविक रस्त्यातच बस अडवून पालखी पूजन करू लागले, तर मूळ उद्देशालाच हरताळ बसेल. त्यामुळे बसमधून पालखी घेऊन जाण्याचा निर्णय अंतिम करण्यात आलेला नाही.गर्दीची शक्यता टाळण्यासाठी पालखी हेलिकॉप्टरमधून घेऊन जाण्याबाबतचा पर्यायदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत समोर आला होता. परंतु विविध ठिकाणांहून निघणाºया पालख्यांसाठी हेलिकॉप्टरचा पर्याय कितपत वस्तुनिष्ठ ठरू शकेल याविषयी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. हेलिकॉप्टरमधून मर्यादित वारकरी पालखीसोबत जातील त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. कोणत्याही एका पालखीसाठी एक निर्णय नव्हे तर सर्व पालख्यांसाठी सारखाच निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र पालखी बसमधून की हेलिकॉप्टरमधून हे अद्यापही ठरलेले नसल्याचे संस्थान पदाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाला या संदर्भात विचारणा केली असता श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानकडून अद्याप बससंदर्भात कोणतीही विचारणा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. बसची मागणी करताच त्यांना बसची सुविधा पुरविण्याची तयारीदेखील महामंडळाने दाखविली आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमShivshahiशिवशाही