शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पावसाअभावी संरक्षित पाण्यावर भातलावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:10 IST

नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भात लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहिरी, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावर भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यातील धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा, उन्हामुळे भात रोपे पिवळी होऊन नष्ट होण्यास सुरुवात

नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भात लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहिरी, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावर भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तालुक्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाची लागवड करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील टाकेद, धामणगाव, भरवीर, अडसरे, सोनोशी, मायदरा आदी असलेल्या डोंगराळ भागातही हीच परिस्थिती आहे. वाडीवऱ्हे, वैतरणा, सांजेगाव, म्हसुर्ली, नागोसली या पश्चिम पट्ट्यात पाऊस असल्याने या भागात भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापपर्यंत पाऊसच नसल्याने लागवडी सुरू झालेल्या नाहीत. इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील अति पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मात्र, भौगोलिक विचार केल्यास तालुक्याच्या निम्म्याहून अधिक भागात चालू वर्षी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.लागवडीला वीज पुरवठ्याचा खोडाआधीच पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भात लागवडी सुरू आहेत. परंतु वीजपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने शेती कामात व्यत्यय येत असल्याने अडचणी कायम आहेत. अनेक वेळा टाकेद भागात सर्रासपणे वीजपुरवठा खंडित होतो आहे तर विजेचा लपंडाव होतानाचे चित्र असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक संतप्त होत आहेत.सध्या पावसाची तुरळक रिमझिम व मध्येच होणाऱ्या उघडीपमुळे ऊन पडत असल्याने शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे. भात रोपे तयार असून, केवळ पावसाच्या पाण्याअभावी लागवडी खोळंबल्या आहेत. पावसाअभावी रोपे पिवळी पडत असून, खराब होण्याच्या मार्गावर आहेत. आजही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा प्रश्न कायम आहे.- पांडुरंग वारुंगसे, शेतकरी. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी