शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाअभावी संरक्षित पाण्यावर भातलावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:10 IST

नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भात लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहिरी, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावर भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यातील धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा, उन्हामुळे भात रोपे पिवळी होऊन नष्ट होण्यास सुरुवात

नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भात लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहिरी, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावर भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तालुक्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाची लागवड करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील टाकेद, धामणगाव, भरवीर, अडसरे, सोनोशी, मायदरा आदी असलेल्या डोंगराळ भागातही हीच परिस्थिती आहे. वाडीवऱ्हे, वैतरणा, सांजेगाव, म्हसुर्ली, नागोसली या पश्चिम पट्ट्यात पाऊस असल्याने या भागात भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापपर्यंत पाऊसच नसल्याने लागवडी सुरू झालेल्या नाहीत. इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील अति पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मात्र, भौगोलिक विचार केल्यास तालुक्याच्या निम्म्याहून अधिक भागात चालू वर्षी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.लागवडीला वीज पुरवठ्याचा खोडाआधीच पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भात लागवडी सुरू आहेत. परंतु वीजपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने शेती कामात व्यत्यय येत असल्याने अडचणी कायम आहेत. अनेक वेळा टाकेद भागात सर्रासपणे वीजपुरवठा खंडित होतो आहे तर विजेचा लपंडाव होतानाचे चित्र असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक संतप्त होत आहेत.सध्या पावसाची तुरळक रिमझिम व मध्येच होणाऱ्या उघडीपमुळे ऊन पडत असल्याने शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे. भात रोपे तयार असून, केवळ पावसाच्या पाण्याअभावी लागवडी खोळंबल्या आहेत. पावसाअभावी रोपे पिवळी पडत असून, खराब होण्याच्या मार्गावर आहेत. आजही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा प्रश्न कायम आहे.- पांडुरंग वारुंगसे, शेतकरी. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी