शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
4
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
5
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
6
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
7
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
8
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
9
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
10
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
11
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
12
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
13
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
14
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
15
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
16
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
17
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
18
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
19
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
20
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

इगतपुरी तालुक्यात भाताचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:48 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे.ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्यावेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमूळे यंदा भातशेती जोमात पिकली होती. शेतकर्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते.परंतु ऐन दिवाळी सणासुधीच्या मोसमात सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर ढगाळ वातावरणात पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव, धामणगाव, टाकेद, अडसरे, गंभीरवाडी, सोनोशी, आंबेवाडी, खेड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारीशिंगवे, बांबळेवाडी या भागातील भातशेती पाण्याखाली आली आहे.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे.ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्यावेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमूळे यंदा भातशेती जोमात पिकली होती. शेतकर्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते.परंतु ऐन दिवाळी सणासुधीच्या मोसमात सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर ढगाळ वातावरणात पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव, धामणगाव, टाकेद, अडसरे, गंभीरवाडी, सोनोशी, आंबेवाडी, खेड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारीशिंगवे, बांबळेवाडी या भागातील भातशेती पाण्याखाली आली आहे. या पावसामुळे या परिसरातील भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे आणि सततच्या पावसामुळे होणाºया रिपरिपमुळे अनेक ठिकाणी भातशेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या भात शेतीची कामे खोळंबली आहेत. ढगाळ वातावरणामुळे भातशेतीच्या गरे, हाळे, इंद्रायणी, आर २४, वाय एस आर, १००८ , सोनम, रूपाली, पूनम, सोनाली या भाताच्या वाणांच्या प्रजातीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होता.ही जमीन दोस्त होऊन पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर बघावयास मिळतो आहे.भातासह,उडीद,सोयाबीन,वरई,खुरासनी,आदी पिके धोक्यात आली आहे.तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी या परिसरातील शेतकर्यांची मागणी आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे भातशेती जोमात आहे.परंतु ऐन दिवाळी सनाच्या मोसमात ढगाळ वातावरणामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या भातशेतीचे नुकसान झालेले आहे.भातशेतीत सर्वत्र पाणी असल्यामुळे यंदा भात काढणी यंत्राचा वापर होत नसल्याने मजुरांकडूनच भात कापणी करावी लागत आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी शेतकर्यांची प्रमुख मागणी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक