शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वडाळागाव परिसरातील  अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:19 IST

वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.

नाशिक : वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.  वडाळागाव हे महापालिका हद्दीत असूनही नसल्यासारखे आहे. येथील नागरिकांना सर्व कर भरूनही नेहमी विविध सोयीसुविधांचा लाभ घेताना संघर्ष करावा लागतो हे विशेष! वडाळागावातील गोपालवाडी रस्त्याची दुरवस्था होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे; मात्र अद्याप पालिकेला या ठिकाणाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वेळ मिळालेला नाही. तसेच येथील भूमिगत गटारी वर्षाच्या बारमाही रस्त्यावरून वाहत असूनही त्यावर भुयारी गटार विभागाला कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास अपयश येत आहे. तसेच येथील सार्वजनिक शौचालयाची मल साठवणूक टाकी फुटल्याने मोकळ्या भूखंडावर मल-मूत्राचे डबके साचले असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. तसेच संजरी मार्ग या अरुंद गल्लीमधील रस्त्याची दैना झाली असून, भूमिगत गटारीच्या चेंबरजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंडोबा चौकापासून पुढे पांढरीआई देवी चौक तसेच माळ गल्लीसह हनुमान मंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यांची वाताहत झाली आहे. वडाळा चौफुली ते खंडोबा चौक हा मुख्य रस्ता मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. तेव्हापासून या रस्त्यावर केवळ थिगळ लावत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावातील सर्वच अंंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम असून, याकडे लोकप्रतिनिधींनाही लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रभाग ३०मध्ये समाविष्ट असलेल्या वडाळागावाला जणू कोणी वालीच राहिले नसल्याची भावना रहिवासी बोलून दाखवित आहे. नगरसेवक चार; समस्या हजार वडाळागावचा सर्वांगीण विकास सातत्याने खुंटलेला आहे. गावाला यंदा चार लोकप्रतिनिधी लाभले खरे; मात्र आपापसामधील मतभेद सोडविताना संबंधितांची दमछाक होत आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनदरबारी त्यांना पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नसल्याची चर्चा गल्लीबोळात होत आहे. वडाळा चौफुलीवरील वाहतूकबेटाला सुशोभिकरणाची असलेली प्रतीक्षा, वडाळा चौफुली ते साईनाथनगरपर्यंत रखडलेल्या जॉगिंग ट्रॅकची झालेली दुर्दशा, केबीएच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सातत्याने साचणारा कचरा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रझा चौक, झीनतनगर भागातील रस्त्यांची दुर्दशा अशा एक ना अनेक समस्या येथील नागरिकांना कायमस्वरूपी भेडसावत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक