शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागाव परिसरातील  अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:19 IST

वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.

नाशिक : वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.  वडाळागाव हे महापालिका हद्दीत असूनही नसल्यासारखे आहे. येथील नागरिकांना सर्व कर भरूनही नेहमी विविध सोयीसुविधांचा लाभ घेताना संघर्ष करावा लागतो हे विशेष! वडाळागावातील गोपालवाडी रस्त्याची दुरवस्था होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे; मात्र अद्याप पालिकेला या ठिकाणाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वेळ मिळालेला नाही. तसेच येथील भूमिगत गटारी वर्षाच्या बारमाही रस्त्यावरून वाहत असूनही त्यावर भुयारी गटार विभागाला कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास अपयश येत आहे. तसेच येथील सार्वजनिक शौचालयाची मल साठवणूक टाकी फुटल्याने मोकळ्या भूखंडावर मल-मूत्राचे डबके साचले असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. तसेच संजरी मार्ग या अरुंद गल्लीमधील रस्त्याची दैना झाली असून, भूमिगत गटारीच्या चेंबरजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंडोबा चौकापासून पुढे पांढरीआई देवी चौक तसेच माळ गल्लीसह हनुमान मंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यांची वाताहत झाली आहे. वडाळा चौफुली ते खंडोबा चौक हा मुख्य रस्ता मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. तेव्हापासून या रस्त्यावर केवळ थिगळ लावत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावातील सर्वच अंंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम असून, याकडे लोकप्रतिनिधींनाही लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रभाग ३०मध्ये समाविष्ट असलेल्या वडाळागावाला जणू कोणी वालीच राहिले नसल्याची भावना रहिवासी बोलून दाखवित आहे. नगरसेवक चार; समस्या हजार वडाळागावचा सर्वांगीण विकास सातत्याने खुंटलेला आहे. गावाला यंदा चार लोकप्रतिनिधी लाभले खरे; मात्र आपापसामधील मतभेद सोडविताना संबंधितांची दमछाक होत आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनदरबारी त्यांना पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नसल्याची चर्चा गल्लीबोळात होत आहे. वडाळा चौफुलीवरील वाहतूकबेटाला सुशोभिकरणाची असलेली प्रतीक्षा, वडाळा चौफुली ते साईनाथनगरपर्यंत रखडलेल्या जॉगिंग ट्रॅकची झालेली दुर्दशा, केबीएच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सातत्याने साचणारा कचरा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रझा चौक, झीनतनगर भागातील रस्त्यांची दुर्दशा अशा एक ना अनेक समस्या येथील नागरिकांना कायमस्वरूपी भेडसावत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक