शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वडाळागाव परिसरातील  अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:19 IST

वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.

नाशिक : वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.  वडाळागाव हे महापालिका हद्दीत असूनही नसल्यासारखे आहे. येथील नागरिकांना सर्व कर भरूनही नेहमी विविध सोयीसुविधांचा लाभ घेताना संघर्ष करावा लागतो हे विशेष! वडाळागावातील गोपालवाडी रस्त्याची दुरवस्था होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे; मात्र अद्याप पालिकेला या ठिकाणाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वेळ मिळालेला नाही. तसेच येथील भूमिगत गटारी वर्षाच्या बारमाही रस्त्यावरून वाहत असूनही त्यावर भुयारी गटार विभागाला कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास अपयश येत आहे. तसेच येथील सार्वजनिक शौचालयाची मल साठवणूक टाकी फुटल्याने मोकळ्या भूखंडावर मल-मूत्राचे डबके साचले असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. तसेच संजरी मार्ग या अरुंद गल्लीमधील रस्त्याची दैना झाली असून, भूमिगत गटारीच्या चेंबरजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंडोबा चौकापासून पुढे पांढरीआई देवी चौक तसेच माळ गल्लीसह हनुमान मंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यांची वाताहत झाली आहे. वडाळा चौफुली ते खंडोबा चौक हा मुख्य रस्ता मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. तेव्हापासून या रस्त्यावर केवळ थिगळ लावत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावातील सर्वच अंंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम असून, याकडे लोकप्रतिनिधींनाही लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रभाग ३०मध्ये समाविष्ट असलेल्या वडाळागावाला जणू कोणी वालीच राहिले नसल्याची भावना रहिवासी बोलून दाखवित आहे. नगरसेवक चार; समस्या हजार वडाळागावचा सर्वांगीण विकास सातत्याने खुंटलेला आहे. गावाला यंदा चार लोकप्रतिनिधी लाभले खरे; मात्र आपापसामधील मतभेद सोडविताना संबंधितांची दमछाक होत आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनदरबारी त्यांना पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नसल्याची चर्चा गल्लीबोळात होत आहे. वडाळा चौफुलीवरील वाहतूकबेटाला सुशोभिकरणाची असलेली प्रतीक्षा, वडाळा चौफुली ते साईनाथनगरपर्यंत रखडलेल्या जॉगिंग ट्रॅकची झालेली दुर्दशा, केबीएच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सातत्याने साचणारा कचरा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रझा चौक, झीनतनगर भागातील रस्त्यांची दुर्दशा अशा एक ना अनेक समस्या येथील नागरिकांना कायमस्वरूपी भेडसावत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक