शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

ओझरच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:30 IST

ओझर : येथे असलेल्या कचरा डेपोतील ढीग जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देकुबट धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ओझर : येथे असलेल्या कचरा डेपोतील ढीग जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणार्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्क ला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहे.त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारु ती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे. ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे.कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार,शिंदे,कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डिम्पंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती.सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधी मुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक सौचालाय सदर ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे. मुख्य गावात सकाळ सायंकाळ धुराची कुबट दुर्गंधी येत आहे.यामुळे लहान बालकांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत अनेकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे पाण्यातून देखील संसर्गजन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सदर डिम्पंग ग्राउंड विषयी प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्विरत पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहे जेणेकरून दररोज उद्भवणार्या त्रासापासून सुटका होईल.सदर ठिकाणला लागून वसाहती असून त्यात अनुसया पार्क व त्याच्या जवळील परिसर, सरकारवाडा, ओम गुरु देव चाळ, तानाजी चौक, चांदणी चौक, शिवाजी रोड, मारु ती वेस, सायखेडा फाटा,राजवाडा,राणाप्रताप चौक, कोळीवाडा आदी ठिकाणच्या रिहवाशांना सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे दूषित धुराचे पसरणारे लोळ अन त्यात उडणारा ठसका अनेकांना गंभीर आजारांना निमंत्रण देईल हे निश्चित आहे त्यामुळे वेळीच ह्या सर्व गोष्टींचे नियोजन केल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही. दरम्यान ग्रामपालिकेतील काही मंडळी नाशिक मनपाचा खत प्रकल्प पाहून भेट देऊन आली. परंतु त्या दौर्यास आता कित्येक मिहने लोटले असताना सदर प्रकल्पाचा नारळ कधी फुटणार असा प्रश्न विचारला जात असताना विकासात्मक दृष्टिकोन कधी होणार अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.