शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
4
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
5
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
6
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
7
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
8
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
9
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
10
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
11
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
12
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
13
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
14
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
15
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
16
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
17
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
18
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
19
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
20
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरफ्लो जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:47 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील ...

ठळक मुद्देगलथानपणा : अगोदर पाणी टंचाई नंतर अपव्यय

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील पाणी साठाही कमालिचा घटला आहे, अशा परिस्थितीत महापालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे त्याच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध जलकुंभ ओव्हरफ्लो होवून त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील वासन नगर येथील पोलिस वसाहती समोरील जलकुंभातून बुधवारी दुपारी लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छा नगर परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी जलकुंभातून पाणी सोडणाºया महापालिकेच्या व्हाल्वमनला परिसरातील संतप्त महिलांनी घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेवून पाणी पुरवठा सुरूळीत करण्याचे काम केले. तरी देखील पुरेशा दाबाने व वेळेत पाणी मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक ३० मधील पाटील गार्डन ते अरुणोदय सोसायटी सह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बुधवारी दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान पोलिस वसाहती समोरील जलकुंभ ओव्हरफ्लो झाला व सदरची बाब व्हॉल्वमनच्या लक्षात न आल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे अवघ्या काही वेळातच जलकुंभ परिसरात जागोजागी पाण्याचे तलाव साचले, भर उकाड्यात शुद्ध पाण्याचा झरा वाहत असल्याचे पाहून परिसरातील बालगोपालांनी या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद द्विगुणीत केला. शहर पाणी टंचाईने होरपळत असताना वाया जाणारे पाणी पाहून नागरिकांनी तातडीने नगरसेवक पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून जलकुंभातून वाया जाणारे पाणी थांबविण्यात यश मिळाले.पंधरा दिवसांपुर्वी सिडकोतील खुटवडनगर येथील जलकुंभातूनही अशाच प्रकारे लाखो लिटर पाणी जलकुंभ ओव्हरफ्लो होवून वाया गेले होते. त्यावेळीही महापालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्यापासून बोध न घेता, महापालिकेचा गलथानपणा कायम राहिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरणात अल्पसाठा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे महापालिकाच आपल्या हक्काच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यास अपयशी ठरत असल्याच्या घटना चिंता वाढविणाºया आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक