शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ओव्हरफ्लो जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:47 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील ...

ठळक मुद्देगलथानपणा : अगोदर पाणी टंचाई नंतर अपव्यय

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील पाणी साठाही कमालिचा घटला आहे, अशा परिस्थितीत महापालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे त्याच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध जलकुंभ ओव्हरफ्लो होवून त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील वासन नगर येथील पोलिस वसाहती समोरील जलकुंभातून बुधवारी दुपारी लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छा नगर परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी जलकुंभातून पाणी सोडणाºया महापालिकेच्या व्हाल्वमनला परिसरातील संतप्त महिलांनी घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेवून पाणी पुरवठा सुरूळीत करण्याचे काम केले. तरी देखील पुरेशा दाबाने व वेळेत पाणी मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक ३० मधील पाटील गार्डन ते अरुणोदय सोसायटी सह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बुधवारी दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान पोलिस वसाहती समोरील जलकुंभ ओव्हरफ्लो झाला व सदरची बाब व्हॉल्वमनच्या लक्षात न आल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे अवघ्या काही वेळातच जलकुंभ परिसरात जागोजागी पाण्याचे तलाव साचले, भर उकाड्यात शुद्ध पाण्याचा झरा वाहत असल्याचे पाहून परिसरातील बालगोपालांनी या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद द्विगुणीत केला. शहर पाणी टंचाईने होरपळत असताना वाया जाणारे पाणी पाहून नागरिकांनी तातडीने नगरसेवक पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून जलकुंभातून वाया जाणारे पाणी थांबविण्यात यश मिळाले.पंधरा दिवसांपुर्वी सिडकोतील खुटवडनगर येथील जलकुंभातूनही अशाच प्रकारे लाखो लिटर पाणी जलकुंभ ओव्हरफ्लो होवून वाया गेले होते. त्यावेळीही महापालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्यापासून बोध न घेता, महापालिकेचा गलथानपणा कायम राहिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरणात अल्पसाठा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे महापालिकाच आपल्या हक्काच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यास अपयशी ठरत असल्याच्या घटना चिंता वाढविणाºया आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक