शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

ओव्हरफ्लो जलकुंभातून लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:47 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील ...

ठळक मुद्देगलथानपणा : अगोदर पाणी टंचाई नंतर अपव्यय

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शहरातील विविध भागात पाणी टंचाई व दुषीत पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण असून, गंगापूर धरणातील पाणी साठाही कमालिचा घटला आहे, अशा परिस्थितीत महापालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे त्याच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध जलकुंभ ओव्हरफ्लो होवून त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील वासन नगर येथील पोलिस वसाहती समोरील जलकुंभातून बुधवारी दुपारी लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छा नगर परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी जलकुंभातून पाणी सोडणाºया महापालिकेच्या व्हाल्वमनला परिसरातील संतप्त महिलांनी घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेवून पाणी पुरवठा सुरूळीत करण्याचे काम केले. तरी देखील पुरेशा दाबाने व वेळेत पाणी मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक ३० मधील पाटील गार्डन ते अरुणोदय सोसायटी सह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बुधवारी दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान पोलिस वसाहती समोरील जलकुंभ ओव्हरफ्लो झाला व सदरची बाब व्हॉल्वमनच्या लक्षात न आल्याने लाखो लिटर पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे अवघ्या काही वेळातच जलकुंभ परिसरात जागोजागी पाण्याचे तलाव साचले, भर उकाड्यात शुद्ध पाण्याचा झरा वाहत असल्याचे पाहून परिसरातील बालगोपालांनी या पाण्यात उड्या मारण्याचा आनंद द्विगुणीत केला. शहर पाणी टंचाईने होरपळत असताना वाया जाणारे पाणी पाहून नागरिकांनी तातडीने नगरसेवक पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून जलकुंभातून वाया जाणारे पाणी थांबविण्यात यश मिळाले.पंधरा दिवसांपुर्वी सिडकोतील खुटवडनगर येथील जलकुंभातूनही अशाच प्रकारे लाखो लिटर पाणी जलकुंभ ओव्हरफ्लो होवून वाया गेले होते. त्यावेळीही महापालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्यापासून बोध न घेता, महापालिकेचा गलथानपणा कायम राहिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरणात अल्पसाठा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे महापालिकाच आपल्या हक्काच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यास अपयशी ठरत असल्याच्या घटना चिंता वाढविणाºया आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक