शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

टेंभूरवाडीत जलसंधारण कामाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:59 IST

सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.

ठळक मुद्देजलसाक्षरता अभियान । लोकसहभागातून गाळाची वाहतूक

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.युवामित्र संस्थेचे सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सिन्नर तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय हनुमान पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालक यांच्या माध्यमातून गावातील जलसंधारणाच्या कामाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. पाणी व्यवस्थापन, जबाबदारी, जास्तीत जास्त सभासद बनविणे तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात कशी भर पाडता येईल व गावातील भूजल पातळीत कशी वाढ करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेत युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवामित्र संस्थेच्या जलसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाने प्रीतम लोणारे यांनी गावात असलेल्या जलस्रोतांमधील गाळ काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामध्ये युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल तसेच बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून करायची असे यावेळी त्यांनी सांगितले. पाणीवापर संस्था सचिव रंगनाथ पाटोळे यांनी मागील दोन वर्षांपासून धनगरी पाझर तलावामध्ये केलेल्या कामांबाबद्दल युवामित्र संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी युवामित्र संस्थेचे क्षेत्र सोमनाथ वाघ, रामदास पालवे, पांडुरंग पाटोळे, रंगनाथ पाटोळे, विष्णू पाटोळे, अशोक पाटोळे, शिवाजी पाटोळे, भाऊसाहेब पाटोळे, दत्तू पाटोळे, जयवंत पालवे, पुंजा पाटोळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी