शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

टेंभूरवाडीत जलसंधारण कामाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:59 IST

सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.

ठळक मुद्देजलसाक्षरता अभियान । लोकसहभागातून गाळाची वाहतूक

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.युवामित्र संस्थेचे सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सिन्नर तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय हनुमान पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालक यांच्या माध्यमातून गावातील जलसंधारणाच्या कामाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. पाणी व्यवस्थापन, जबाबदारी, जास्तीत जास्त सभासद बनविणे तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात कशी भर पाडता येईल व गावातील भूजल पातळीत कशी वाढ करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेत युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवामित्र संस्थेच्या जलसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाने प्रीतम लोणारे यांनी गावात असलेल्या जलस्रोतांमधील गाळ काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामध्ये युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल तसेच बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून करायची असे यावेळी त्यांनी सांगितले. पाणीवापर संस्था सचिव रंगनाथ पाटोळे यांनी मागील दोन वर्षांपासून धनगरी पाझर तलावामध्ये केलेल्या कामांबाबद्दल युवामित्र संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी युवामित्र संस्थेचे क्षेत्र सोमनाथ वाघ, रामदास पालवे, पांडुरंग पाटोळे, रंगनाथ पाटोळे, विष्णू पाटोळे, अशोक पाटोळे, शिवाजी पाटोळे, भाऊसाहेब पाटोळे, दत्तू पाटोळे, जयवंत पालवे, पुंजा पाटोळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी