शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

द्राक्ष, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:48 IST

पाटोदा : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन दिवस पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष,कांदा, कांदा रोपे, गहू, हरभरा व भाजीपाला पिकांवर चिकटा, मर, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करण्यास प्रारंभ केला आहे. या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसत आहे. भुरी, डावणी व घडकुजीचे प्रमाण वाढले असून, औषध फवारणीमुळे खर्चात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळीची हजेरी : ढगाळ, रोगट हवामानामुळे शेतकऱ्यांना धडकी

अजून सहा ते सात दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. आधीच कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगाने थैमान घेतले आहे, तर कांदा रोपांवर बुरशीजन्य रोगांनी अतिक्रमण केले आहे. त्यात पुन्हा वातावरणात बदल होऊन ढगाळ व रोगट हवामान निर्माण झाल्याने कांदा रोपे पूर्णतः खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे कांदा रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये किलोचे बियाणे उपलब्ध करून लाल व उन्हाळ कांदा लागवडीसाठी रोपे तयार केली आहेत, मात्र वातावरणातील बदलामुळे कांदा लागवडीच्या आशा धूसर झाल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा या पिकांनादेखील मावा व मर रोगाने घेरले आहे. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे. काही शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी केल्यानंतर हरभरा पेरणी केली होती. हे पीक आता फुलोऱ्यात आहे, तर काही पिकांना घाटे लागले असून, घाटेअळी वाढली आहे.वातावरणातील बदलाचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. शेतातील मेथी, पालक, गिलके, वाल, दोडके या भाजीपाला पिकावर मावा तसेच घुबड्याने अतिक्रमण केल्याने संपूर्ण पिके खराब झाली आहेत. औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ व रोगट हवामानामुळे द्राक्षबागांवर भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. चार-पाच दिवसांपासून दिवसातून चार वेळेस औषधे तसेच बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.- पांडुरंग शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तांदूळवाडी

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती