शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

द्राक्ष, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:48 IST

पाटोदा : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन दिवस पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष,कांदा, कांदा रोपे, गहू, हरभरा व भाजीपाला पिकांवर चिकटा, मर, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करण्यास प्रारंभ केला आहे. या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसत आहे. भुरी, डावणी व घडकुजीचे प्रमाण वाढले असून, औषध फवारणीमुळे खर्चात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळीची हजेरी : ढगाळ, रोगट हवामानामुळे शेतकऱ्यांना धडकी

अजून सहा ते सात दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. आधीच कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगाने थैमान घेतले आहे, तर कांदा रोपांवर बुरशीजन्य रोगांनी अतिक्रमण केले आहे. त्यात पुन्हा वातावरणात बदल होऊन ढगाळ व रोगट हवामान निर्माण झाल्याने कांदा रोपे पूर्णतः खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे कांदा रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये किलोचे बियाणे उपलब्ध करून लाल व उन्हाळ कांदा लागवडीसाठी रोपे तयार केली आहेत, मात्र वातावरणातील बदलामुळे कांदा लागवडीच्या आशा धूसर झाल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा या पिकांनादेखील मावा व मर रोगाने घेरले आहे. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे. काही शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी केल्यानंतर हरभरा पेरणी केली होती. हे पीक आता फुलोऱ्यात आहे, तर काही पिकांना घाटे लागले असून, घाटेअळी वाढली आहे.वातावरणातील बदलाचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. शेतातील मेथी, पालक, गिलके, वाल, दोडके या भाजीपाला पिकावर मावा तसेच घुबड्याने अतिक्रमण केल्याने संपूर्ण पिके खराब झाली आहेत. औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ व रोगट हवामानामुळे द्राक्षबागांवर भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. चार-पाच दिवसांपासून दिवसातून चार वेळेस औषधे तसेच बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.- पांडुरंग शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तांदूळवाडी

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती