शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:00 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराजापूर : शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडला संकटात

अनिल अलगटराजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधांवर शेतकऱ्यांच्या खर्च वाढला आहे. राजापूरच्या काही भागात विहिरींना अजूनही पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरीही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा अजून पाऊस झालेला नाही. राजापुरच्या काही भागात विहिरींना पाणी आहे, तर काही भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे.अधूनमधुन येणाऱ्या हलक्या सरींनी अस्तित्व दाखवल्याने पिकं जोमाने दिसत आहेत; पण मका, बाजरी, कपाशी या पिकांना पावसाची नितांत गरज असून दमदार पाऊस केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाची स्थिती चांगली राहील असे भाकीत हवामान खात्याने केले होते; पण हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून राजापूर व परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने छोटेमोठे नाले, बंधारे आजही कोरडेठाक आहेत.येवला तालुक्यातील पूर्व भागाचे भवितव्य हे निसर्गावरच अवलंबून असून, येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी या भागाला टंचाई असते. दररोज ढगाळ वातावरण व थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके तरारली आहे. परंतु, विहिरींना पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, तो मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. टोमॅटो पिकावर करपा व काळा ठिपका आला असल्याने पन्नास टक्के उत्पादन घटणार आहे यात शंका नाही.यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत चांगला पाऊस होईल असा ताजा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांचे हवामान खात्याकडे लक्ष आहे. त्यामुळे दोन महिन्यांत चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे.टोमॅटो पिकाला सध्या तरी बाजारभाव लक्षात घेऊन शेतकरी टोमॅटो पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या औषध फवारणीवर खर्च करीत आहे. टोमॅटो पीक.

नाशिक जिल्ह्यात यावर्षी टोमॅटो लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती