शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:00 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराजापूर : शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडला संकटात

अनिल अलगटराजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधांवर शेतकऱ्यांच्या खर्च वाढला आहे. राजापूरच्या काही भागात विहिरींना अजूनही पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरीही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा अजून पाऊस झालेला नाही. राजापुरच्या काही भागात विहिरींना पाणी आहे, तर काही भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे.अधूनमधुन येणाऱ्या हलक्या सरींनी अस्तित्व दाखवल्याने पिकं जोमाने दिसत आहेत; पण मका, बाजरी, कपाशी या पिकांना पावसाची नितांत गरज असून दमदार पाऊस केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाची स्थिती चांगली राहील असे भाकीत हवामान खात्याने केले होते; पण हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून राजापूर व परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने छोटेमोठे नाले, बंधारे आजही कोरडेठाक आहेत.येवला तालुक्यातील पूर्व भागाचे भवितव्य हे निसर्गावरच अवलंबून असून, येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी या भागाला टंचाई असते. दररोज ढगाळ वातावरण व थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके तरारली आहे. परंतु, विहिरींना पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, तो मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. टोमॅटो पिकावर करपा व काळा ठिपका आला असल्याने पन्नास टक्के उत्पादन घटणार आहे यात शंका नाही.यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत चांगला पाऊस होईल असा ताजा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांचे हवामान खात्याकडे लक्ष आहे. त्यामुळे दोन महिन्यांत चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे.टोमॅटो पिकाला सध्या तरी बाजारभाव लक्षात घेऊन शेतकरी टोमॅटो पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या औषध फवारणीवर खर्च करीत आहे. टोमॅटो पीक.

नाशिक जिल्ह्यात यावर्षी टोमॅटो लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती