शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:00 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराजापूर : शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडला संकटात

अनिल अलगटराजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे. परंतु, सतत येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके हिरवीगार असली तरी टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधांवर शेतकऱ्यांच्या खर्च वाढला आहे. राजापूरच्या काही भागात विहिरींना अजूनही पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरीही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा अजून पाऊस झालेला नाही. राजापुरच्या काही भागात विहिरींना पाणी आहे, तर काही भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे.अधूनमधुन येणाऱ्या हलक्या सरींनी अस्तित्व दाखवल्याने पिकं जोमाने दिसत आहेत; पण मका, बाजरी, कपाशी या पिकांना पावसाची नितांत गरज असून दमदार पाऊस केव्हा होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाची स्थिती चांगली राहील असे भाकीत हवामान खात्याने केले होते; पण हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून राजापूर व परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने छोटेमोठे नाले, बंधारे आजही कोरडेठाक आहेत.येवला तालुक्यातील पूर्व भागाचे भवितव्य हे निसर्गावरच अवलंबून असून, येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी या भागाला टंचाई असते. दररोज ढगाळ वातावरण व थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या रिमझिम पावसावर पिके तरारली आहे. परंतु, विहिरींना पाणी उतरले नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, तो मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. टोमॅटो पिकावर करपा व काळा ठिपका आला असल्याने पन्नास टक्के उत्पादन घटणार आहे यात शंका नाही.यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत चांगला पाऊस होईल असा ताजा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांचे हवामान खात्याकडे लक्ष आहे. त्यामुळे दोन महिन्यांत चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे.टोमॅटो पिकाला सध्या तरी बाजारभाव लक्षात घेऊन शेतकरी टोमॅटो पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या औषध फवारणीवर खर्च करीत आहे. टोमॅटो पीक.

नाशिक जिल्ह्यात यावर्षी टोमॅटो लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती