शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:47 IST

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.

नाशिक : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आयोजकांनी तूर्तास वेट ॲण्ड वॉच, अशी भूमिका घेतली आहे. संमेलनासाठी महिनाभराचा कालावधी असून, तोपर्यंत परिस्थिती निवळेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. 

गेल्या काही दिवसांत कोराेना बाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी झाला असून, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. नाशिकमध्ये तूर्तास रात्री संचारबंदी देखील लागू केली आहे. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी भुजबळ व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलन होईल किंवा नाही याबाबत प्रश्न केले जात असताना संमेलनाचे निमंत्रक आणि लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र संमेलनापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सांगून आशावाद व्यक्त केला आहे.  

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.  अनेक समित्यांच्या बैठका ऑनलाइन, तर काही समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका घेताना आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे. संमेलनासाठी एक महिन्यांचा कालावधी आहे. शासनाचे धोरण व नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल, असे जातेगावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस