शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याची आयोजकांना आशा; जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:47 IST

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.

नाशिक : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आयोजकांनी तूर्तास वेट ॲण्ड वॉच, अशी भूमिका घेतली आहे. संमेलनासाठी महिनाभराचा कालावधी असून, तोपर्यंत परिस्थिती निवळेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. 

गेल्या काही दिवसांत कोराेना बाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी झाला असून, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. नाशिकमध्ये तूर्तास रात्री संचारबंदी देखील लागू केली आहे. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी भुजबळ व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलन होईल किंवा नाही याबाबत प्रश्न केले जात असताना संमेलनाचे निमंत्रक आणि लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र संमेलनापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सांगून आशावाद व्यक्त केला आहे.  

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे.  अनेक समित्यांच्या बैठका ऑनलाइन, तर काही समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका घेताना आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे. संमेलनासाठी एक महिन्यांचा कालावधी आहे. शासनाचे धोरण व नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल, असे जातेगावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस