शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सेंद्रिय भाजीपाल्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:03 IST

जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला विशेष पसंती देतात. साहजिकच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे ६0 शेतकºयांकडून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री एकाच छताखाली करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरोग्य जागृती : शेतकऱ्यांच्या उपक्रमाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला विशेष पसंती देतात. साहजिकच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे ६0 शेतकºयांकडून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री एकाच छताखाली करण्यात येत आहे.आरोग्यविषयक जनजागृतीच्या या उपक्रमाला नाशिक शहरातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय भाजीपाल्याबरोबर दूध, तूप आणि गूळ आणि धान्य सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेले असल्याने त्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.धावपळीच्या आणि ताणतणावाच्या बदलत्या जीवनशैलीत मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आहारात रासायनिक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला येत असल्याने वेगवेगळे आजार वाढत आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या पालेभाज्या व फळभाज्या खरेदीकडे गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचा कल वाढला आहे.जिल्ह्यातील काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवत असून, त्याचा दर तुलनेने जास्त असला तरी आरोग्यासाठी असलेल्या भाजीपाला खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता मुखेड, येवला, पिंपळगाव, वडनेर भैरव, बोराळे, वाडगाव, सिन्नर, धोंडबार, सोनारी, चांदवड आदी भागातील सुमारे ६0 शेतकरी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी नाशिक येथे मुंबई नाका परिसरातील विक्रीसाठी आणत आहेत.शहरातील विविध भागातील ग्राहक या ठिकाणी येऊन सेंद्रिय पालेभाज्या व फळभाज्या खरेदी करत आहेत.४फळे, दूध, तूप, गूळ आणि धान्य हेदेखील सेंद्रिय पद्धतीनेच असल्याने त्याचीही खरेदी ग्राहक करीत आहेत. एकाच छताखाली सर्व भाजीपाला उपलब्ध असल्याने शेतकºयांना हमीभावदेखील चांगला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकºयांसाठी प्रा. प्रभाकर मोराणकर यांनी स्वत:च्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती