शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

सेंद्रिय कृषीमालाला नाशिककरांची पसंती, कृषिमहोत्सवात शहरवासियांचा खरेदीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:04 IST

शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कु चंबणा थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वरूपी शेतीमालासाठी ग्राहक उपलब्ध होतील, या उद्देशाने नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषिमहोत्सवात पहिल्या दिवसापासून शहरवासीय व शेतकºयांची गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे नाशिककरांचा पारंपारिक पद्धतीने उत्पादिक कृषी मालाला पसंतीसेंद्रीय अन्नधान्य, कडधान्य खरेदीला ग्राहकांचे प्राधान्यजिल्हा कृषी महोत्सवाला शहरवासियांचा प्रतिसाद

नाशिक : शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कु चंबणा थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वरूपी शेतीमालासाठी ग्राहक उपलब्ध होतील, या उद्देशाने नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषिमहोत्सवात पहिल्या दिवसापासून शहरवासीय व शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या कृषी महोत्सवामध्ये शनिवारी शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विक्रेता व खरेदीदार मार्गदर्शन कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद घडवून आणण्यात आला. दरम्यान, ग्राहकांनी महोत्सवामध्ये सेंद्रिय अन्नधान्यासह फळभाज्या व पालेभाज्या खरेदीला पसंती दिली असून, अन्नधान्यांमध्ये ग्राहकांना गावरान व सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या तांदूळ, बाजरी, नागली, वरई, गहू यांसह विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्य खरेदीला नाशिककरांडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या कृषिमहोत्सवाला भेट देणाऱ्या नाशिककरांमध्ये बहुतांश नागरिकांनाच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यापेक्षा योग्य दरात मिळणारा कृषीमाल खरेदीक डेच अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कृषिमहोत्सवाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे. गावाकडे शेती उत्पादनाला ग्राहक मिळत नाही. त्यामुळे अनेकदा माल पडून राहतो, नाही तर मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. परंतु कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक कृषी उत्पादनाला ग्राहकांची चांगली मागणी आहे. या महोत्सवात आम्ही गरी कोळपी तांदळासह आणखी काही उत्पादने विक्रीसाठी ठेवली असून, नाशिकरांकडून गरी कोळपी तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळते असल्याचे जातेगाव येथील तांदूळ विक्रेता किरण कांडेकर यांनी सांगितले. 

समाज कल्याण, कृषी विभागाचा देखावाकृषिमहोत्सवात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजनांसोबतच कृषिपूरक उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी स्टॉल्स लावले आहेत. यातील नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने लावलेल्या स्टॉलवर विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी माहिती देण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नाही. तसेच कोणत्याही योजनांचे माहितीपत्रक उपलब्ध नसल्याने स्टॉल केवळ देखाव्यासाठी उभा केला का असा सवाल असल्याने येणाºया शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तर कृषी विभागाने निर्यातक्षम कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडले आहे. परंतु शेतकऱ्यांनी संबंधित उत्पादनांची माहिती विचारली तर कृषी विभागाचे अधिकारी संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि मोबाइल नंबर देऊन आम्हाला उत्पादनांविषयी माहिती नसल्याचे सांगत असल्याने या कृषी महोत्सवात कृषी विभागासोबतच समाज कल्याण विभागाचीही उदासीनता दिसून आली. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारsaleविक्री