शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवेचा आदेश सरकारकडून मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:18 IST

राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत समावून न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला होता.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांचे प्रयत्न : कर्मचारी महासंघाकडून निर्णयाचे स्वागत९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेचा आधार घेत राज्यात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना तीन वर्षानंतर नियुक्ती न देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तुर्त स्थगित केला आहे. या संदर्भात आमदार छगन भुजबळ यांनी तुरूंगातून राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून या संदर्भात विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती, ही सुचना चर्चेला येण्यापुर्वीच सरकारने स्वत:च्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत समावून न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला होता. राज्यात जवळपास गेल्या २० वर्षापासून सर्वच शासकीय विभागात कंत्राटी व करार पद्धतीने कार्यरत असून, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेवून लाखो कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. या संदर्भात शासनाने ज्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला त्यात कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेली पदे कायम स्वरूपी समजण्यात येवू नये अशा स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत. परंतु राज्य सरकारने सरसकट हा निकष सर्वच पदांना लागू केल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उलट कंत्राटी कर्मचाºयांना सुरक्षा प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईत बैठक घेण्यात आली होती व त्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. असे असताना शासनाचा निर्णय विरोधाभास करणारा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते. शासनाने ९ फेबु्रवारीचा निर्णय तात्काळ रद्द करावा तसेच किमान दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाºयांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कालबद्ध धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती.शासनाने या पत्राची दखल घेत बुधवार दि. ७ मार्च रोजी या संदर्भात परिपत्रक काढले असून, त्यात म्हटले आहे, शासनाने ९ मार्च फेब्रुवारी रोजी काढलेल्या सुचनांचे पुनर्विलोकन करण्यात येत असून, तो पर्यंत सदरहू शासन परिपत्रकातील सूचनांना स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाचे महाराष्टÑ राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने स्वागतकेले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक