शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवेचा आदेश सरकारकडून मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:18 IST

राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत समावून न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला होता.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांचे प्रयत्न : कर्मचारी महासंघाकडून निर्णयाचे स्वागत९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेचा आधार घेत राज्यात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना तीन वर्षानंतर नियुक्ती न देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तुर्त स्थगित केला आहे. या संदर्भात आमदार छगन भुजबळ यांनी तुरूंगातून राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून या संदर्भात विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती, ही सुचना चर्चेला येण्यापुर्वीच सरकारने स्वत:च्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत समावून न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला होता. राज्यात जवळपास गेल्या २० वर्षापासून सर्वच शासकीय विभागात कंत्राटी व करार पद्धतीने कार्यरत असून, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेवून लाखो कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. या संदर्भात शासनाने ज्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला त्यात कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेली पदे कायम स्वरूपी समजण्यात येवू नये अशा स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत. परंतु राज्य सरकारने सरसकट हा निकष सर्वच पदांना लागू केल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उलट कंत्राटी कर्मचाºयांना सुरक्षा प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईत बैठक घेण्यात आली होती व त्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. असे असताना शासनाचा निर्णय विरोधाभास करणारा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते. शासनाने ९ फेबु्रवारीचा निर्णय तात्काळ रद्द करावा तसेच किमान दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाºयांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कालबद्ध धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती.शासनाने या पत्राची दखल घेत बुधवार दि. ७ मार्च रोजी या संदर्भात परिपत्रक काढले असून, त्यात म्हटले आहे, शासनाने ९ मार्च फेब्रुवारी रोजी काढलेल्या सुचनांचे पुनर्विलोकन करण्यात येत असून, तो पर्यंत सदरहू शासन परिपत्रकातील सूचनांना स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाचे महाराष्टÑ राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने स्वागतकेले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक