शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वीजबिले कमी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 18:11 IST

न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिले रद्द करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देवीज वितरणकडून दखल माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान

नांदगाव : न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी येथील वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांना याविषयी जाब विचारला.सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिले रद्द करण्याचे आदेश दिले.

आधी कवडे यांना तुमचे बिल आम्ही कमी केले आहे ना? अशी मखलाशी करून शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कवडे यांनी माणिकपुंज धरणातून शेतीसाठी पाणी उचलणाºया सर्व शेतकºयांचे सदर कालावधीतील बिल का आकारू नये याविषयी वस्तुस्थिती मांडली. लोकमतमध्ये छापून आलेल्या वृत्ताचा संदर्भ दिला. तेव्हा साळुंके यांनी जे शेतकरी आमच्याकडे येतील त्यांची बिले कमी करून देऊ असे सांगितले; परंतु तुमची चूक आहे. तुमच्या पातळीवर सर्वांचीच बिले कमी करण्यात यावी, असे त्यांना स्पष्ट केले.जुलै ते नोव्हें. २०१७ या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र खंडित कालावधीची बिले अदा करण्यात आली. बिलात १० अश्वशक्तीच्या पंपासाठी १२ हजार रु . चार्ज करण्यात आले होते. असे सुमारे २०० ते ३०० पंप आहेत. याचा गौप्यस्फोट लोकमतने केला. यंदा सरासरीपेक्षा २५ टक्केच पाऊस झाला आहे. परतीच्या पावसानेही दगा दिला आहे. त्यामुळे माणिकपुंज धरणातील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे, अशी जनतेची मागणी आहे. तथापि कागदोपत्री अद्याप तसे करण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने वीज वितरण कंपनी व जलसंपदा विभाग यांना डोळ्यात तेल घालून पाणी अनाधिकाराने उचलण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये असे आदेश काढावेत, अशी मागणी कवडे यांनी केली आहे. तसेच शहरात तीन दिवसांपासून विजेचे भारनियमन सुरू असून, शहरात दोन भागात वेगवेगळ्या निकषाने आठ तासांपेक्षाही अधिक वेळ भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजbillबिल