शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:54 IST

नाशिक जिल्ह्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला असून, आकाशात ढगांनी गर्दी केल्याने हवेत उष्मा वाढून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत सोमवारी दुपारनंतर नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, निफाड, नांदगाव, दिंडोरी या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने शेतकºयांची धांदल उडाली. द्राक्ष बागायतदारांचे त्यामुळे नुकसान झाले. छाटणी झालेल्या द्राक्षाच्या झाडाला लावलेले औषध पावसाच्या पाण्याने धुवून निघाले तर ज्या द्राक्षबागांनी फुलोरा धरला होता, त्याची फुले गळून पडली. द्राक्षांचे मणी गळून पडले. त्याचबरोबर खरिपाचा काढून ठेवलेला कांदा उघड्यावर असल्याने भिजला, मक्याचे कणीसदेखील पावसाच्या पाण्यात भिजल्याचे शेतकºयांनी सांगितले.वस्तुनिष्ठ अहवालाच्या सूचनारब्बीची पिके घेण्यास तयार असलेल्या शेतकºयांना मात्र या अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, अगोदरच कमी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांवर अवकाळी पावसाने संकट कोसळल्याने शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार