शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:23 IST

बहुचर्चित पाणीपुरवठा विहीर भ्रष्टाचार प्रकरणी अटक केलेल्या ठेकेदाराला विहिरीचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी न्यायालयात जामिनाची पूर्वशर्त म्हणून तीस लाख रुपये मालेगाव सत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिरुद्ध गांधी यांनी दिले. सटाणा पोलिसांनी अटक केलेल्या विजय गिरिधारीलाल या ठेकेदाराची वरील अटी-शर्ती ठेवून एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने सुटका केली आहे.

ठळक मुद्देसटाणा विहीर भ्रष्टाचार प्रकरण : अटी-शर्तीवर ठेकेदाराची सुटका

सटाणा : बहुचर्चित पाणीपुरवठा विहीर भ्रष्टाचार प्रकरणी अटक केलेल्या ठेकेदाराला विहिरीचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी न्यायालयात जामिनाची पूर्वशर्त म्हणून तीस लाख रुपये मालेगाव सत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिरुद्ध गांधी यांनी दिले. सटाणा पोलिसांनी अटक केलेल्या विजय गिरिधारीलाल या ठेकेदाराची वरील अटी-शर्ती ठेवून एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने सुटका केली आहे.बांधकाम झाल्यानंतर नगरसेवक मुन्ना शेख यांनी विहीर बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून, मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणी दरम्यानच विहिरीचे बांधकाम कोसळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार, तांत्रिक सल्लागार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानंतर सटाणा पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतर चारही संशयित आरोपींनी अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र उच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावल्याने तब्बल दहा महिने चारही जण फरार होते. पैकी ठेकेदार विजय गिरधारीलाल दि. ११ डिसेंबरला पोलिसांना शरण आला.मालेगाव सत्र न्यायालयाने ठेकदार विजय गिरधारीलाल यांचा जमीन मंजूर केला असून, अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. तक्र ारदाराचा पुरावा नष्ट करण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नये आणि साक्षीदार यांना धमकी देऊ नये, ठेकेदाराने त्याचा नेहमीचा अधिकृत पत्ता, मोबाइल नंबरसह दाखल करावा. ठेकेदाराने जामिनाची पूर्वशर्त म्हणून न्यायालयात ३० लाख रुपये जमा करावेत, ठेकेदाराने सुटका झाल्याच्या दिवसापासून चार महिन्यांच्या आत स्वखर्चाने विहिरीचे बांधकाम करून द्यावे, पालिका प्रशासनाने या कामासाठी कार्यारंभ आदेश द्यावेत, विहिरीचे पुनर्बांधणीचे काम ठेकेदाराच्या खर्चाने झाल्यानंतर ठेकेदार व पालिका प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडील पूर्णत्वाचा अहवाल न्यायालयात दाखल करावा, पूर्णत्वाचा अहवाल मिळाल्यानंतर न्यायालयात जमा केलेली तीसलाख रुपयांची रक्कम ठेकेदाराला परत केली जाईल, असे न्यायमूर्ती गांधी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेसाठी ९३ लाख रु पये खर्चून नदीपात्रालगत विहीर खोदकाम व बांधकाम करण्यात आले होते. ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांनी संगनमत करून गुणवत्ता नियंत्रण विभागाचे बनावट प्रमाणपत्र पालिकेला सादर केले. त्यानंतर त्या आधारे बिले काढून घेण्यात आली. बिले काढल्यानंतर काही दिवसांत विहिरीचे बांधकाम कोसळून भुईसपाट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी