शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

सोमपूर शिवारातून पाणी देण्यास विरोध

By admin | Updated: May 6, 2014 22:26 IST

जायखेडा : बागलाण तालुक्यात सोमपूर शिवारात विहीर खोदून जलवाहिनीद्वारे बाहेरगावी पाणी घेऊन जाण्यास सोमपूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे

जायखेडा : बागलाण तालुक्यात सोमपूर शिवारात विहीर खोदून जलवाहिनीद्वारे बाहेरगावी पाणी घेऊन जाण्यास सोमपूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सोमपूर शिवारातून लाडूद शिवारात जात असलेले जलवाहिनीचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. दिवसेंदिवस वाढती पाणीटंचाई लक्षात घेता सोमपूर ग्रामपंचायतीने २०१२ मध्ये सोमपूर शिवारातून बाहेर गावी पाणी न जाऊ देण्याचा ठराव केला आहे. यात सोमपूरच्या शेतकर्‍यांनी बाहेरगावच्या शेतकर्‍यांना विहिरी खोदण्यासाठी जागा देवू नये व सोमपूर शिवारातील पाणी जलवाहिनीद्वारे बाहेरगावी जावू नये असा निर्णय घेतला आहे. सोमपूर हे गाव मोसम नदीकाठी असल्याने परिसरातील अनेक मोठे शेतकरी येथे मोठ्या किंमती देवून विहिरीसाठी जमिनी विकत घेतात व त्या जमिनींवर विहिरी खोदून जलवाहिनीद्वारे पाणी वाहून नेतात. यामुळे येथे बेसुमार पाणी उपसा होत असून येथील भूगर्भातील जलसाठ्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथून पाणी घेऊन जाण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. लाडूद, बिजोटे, निताणे या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या व परिसरातील गावांच्या शेतकर्‍यांच्या जलवाहिन्या येथूनच गेल्या आहेत. या जलवाहिण्यांना कुठलाही विरोध न करता नवीन जलवाहिण्या जावू देण्यास या ग्रामस्थांचा विरोध आहे. अशाही परिस्थितीत लाडूद येथील शेतकरी नवीन जलवाहिनी टाकून लाडूद शिवारात शेतीसाठी पाणी घेऊन जात आहे. या शेतकर्‍यांची पहिलेच एक जलवाहिनी कार्यान्वित असताना व सोमपूर गावाचा एकमुखी ठराव झाला असताना नवीन जलवाहिनी जात असल्याने ग्रामस्थांचा त्यास तीव्र विरोध आहे. सदर शेतकर्‍याने तहसीलदारांच्या मदतीने ज्या शेतकर्‍यांच्या शेती क्षेत्रातून जलवाहिनी जाणार आहे त्यांना नोटीसा पाठवून जलवाहिनीस विरोध न करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र जलवाहिनी जावू न देण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम आहेत. लाडूद येथील शेतकर्‍याने आज पोलीस संरक्षणात जलवाहिनी नेण्याचा प्रयत्न केला; मात्र सोमपूर येथील शेकडो स्त्री-पुरुष नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. कुठल्याही परिस्थितीत जलवाहिणी जावू देणार नाही असा पवित्रा जल बचाव समिती व सदस्यांनी घेतला. शासकीय प्रतिनिधी म्हणून आर. एस. महाले यांनी चर्चा केली. मात्र त्यात यश आले नाही. यावेळी सरपंच सौ. सविता नहिरे, पंढरीनाथ नहिरे, प्रविण भामरे, प्रमिला भामरे यांनी गावकर्‍यांची भूमिका मांडली.