शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सोमपूर शिवारातून पाणी देण्यास विरोध

By admin | Updated: May 6, 2014 22:26 IST

जायखेडा : बागलाण तालुक्यात सोमपूर शिवारात विहीर खोदून जलवाहिनीद्वारे बाहेरगावी पाणी घेऊन जाण्यास सोमपूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे

जायखेडा : बागलाण तालुक्यात सोमपूर शिवारात विहीर खोदून जलवाहिनीद्वारे बाहेरगावी पाणी घेऊन जाण्यास सोमपूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सोमपूर शिवारातून लाडूद शिवारात जात असलेले जलवाहिनीचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. दिवसेंदिवस वाढती पाणीटंचाई लक्षात घेता सोमपूर ग्रामपंचायतीने २०१२ मध्ये सोमपूर शिवारातून बाहेर गावी पाणी न जाऊ देण्याचा ठराव केला आहे. यात सोमपूरच्या शेतकर्‍यांनी बाहेरगावच्या शेतकर्‍यांना विहिरी खोदण्यासाठी जागा देवू नये व सोमपूर शिवारातील पाणी जलवाहिनीद्वारे बाहेरगावी जावू नये असा निर्णय घेतला आहे. सोमपूर हे गाव मोसम नदीकाठी असल्याने परिसरातील अनेक मोठे शेतकरी येथे मोठ्या किंमती देवून विहिरीसाठी जमिनी विकत घेतात व त्या जमिनींवर विहिरी खोदून जलवाहिनीद्वारे पाणी वाहून नेतात. यामुळे येथे बेसुमार पाणी उपसा होत असून येथील भूगर्भातील जलसाठ्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथून पाणी घेऊन जाण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. लाडूद, बिजोटे, निताणे या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या व परिसरातील गावांच्या शेतकर्‍यांच्या जलवाहिन्या येथूनच गेल्या आहेत. या जलवाहिण्यांना कुठलाही विरोध न करता नवीन जलवाहिण्या जावू देण्यास या ग्रामस्थांचा विरोध आहे. अशाही परिस्थितीत लाडूद येथील शेतकरी नवीन जलवाहिनी टाकून लाडूद शिवारात शेतीसाठी पाणी घेऊन जात आहे. या शेतकर्‍यांची पहिलेच एक जलवाहिनी कार्यान्वित असताना व सोमपूर गावाचा एकमुखी ठराव झाला असताना नवीन जलवाहिनी जात असल्याने ग्रामस्थांचा त्यास तीव्र विरोध आहे. सदर शेतकर्‍याने तहसीलदारांच्या मदतीने ज्या शेतकर्‍यांच्या शेती क्षेत्रातून जलवाहिनी जाणार आहे त्यांना नोटीसा पाठवून जलवाहिनीस विरोध न करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र जलवाहिनी जावू न देण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम आहेत. लाडूद येथील शेतकर्‍याने आज पोलीस संरक्षणात जलवाहिनी नेण्याचा प्रयत्न केला; मात्र सोमपूर येथील शेकडो स्त्री-पुरुष नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. कुठल्याही परिस्थितीत जलवाहिणी जावू देणार नाही असा पवित्रा जल बचाव समिती व सदस्यांनी घेतला. शासकीय प्रतिनिधी म्हणून आर. एस. महाले यांनी चर्चा केली. मात्र त्यात यश आले नाही. यावेळी सरपंच सौ. सविता नहिरे, पंढरीनाथ नहिरे, प्रविण भामरे, प्रमिला भामरे यांनी गावकर्‍यांची भूमिका मांडली.