शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाघाड कालव्याचे पाणी पाईपलाईनने नेण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:26 IST

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदिंडोरी : मडकीजांब येथील बैठकीत सर्व शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.वाघाड धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी केला जातो. हातनोरे, निळवंडी, पाडे, मडकीजांब, दिंडोरी, कोराटे, अक्र ाळे, मोहाडी, आंबे दिंडोरी, खतवड , जानोरी, जऊळके दिंडोरी या गावांची शेती या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे. या कालव्याची रब्बी व उन्हाळी आवर्तने शेतीसाठी वरदान ठरत असतात व द्राक्ष शेती सुदधा याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे.या कालव्यावर अनेक वर्षापासुन उचल व प्रवाही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या असुन पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाची निर्मिती केलेली आहे. पाणी वापर संस्थांना त्यांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करून पाणी पुरवण्यात येते व त्या प्रमाणात पाणीपट्टी आकारण्यात येते.अशी परिस्थिती असतांना काही दिवसांपुर्वी वाघाड पाणी वापर महासंघाच्या बैठकीत पाणी गळतीचे कारण देत वाघाड डाव्या कालव्याचे१५ कि. मी. तसेच वाघाड उजवा कालव्याचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने ४५ कि.मी. पर्यंत नेण्याचा ठराव झाल्याची माहीती शेतकºयांना समजली व त्या निर्णयाविरोधात शेतकºयांनी एकत्र येत मडकीजांब येथे बैठक घेऊन या निर्णयास कडाडून विरोध दर्शविला आहे.यावेळी वाघाड पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष तुषार वसाळ, उपाध्यक्ष मधुकर पवार, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत राजे, प्रकाश वडजे, दिनकर जाधव, दत्तात्रय जाधव, दिलीप जाधव, बाळासाहेब मुरकुटे, कैलास पाटील, बाळासाहेब धुमणे, रमेश वडजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी अंबादास पाटील, सोमनाथ बोरस्ते नरेश देशमुख आदींसह शेतकºयांनी मनोगतातून प्रस्तावित पाईपलाईन योजनेस विरोध दर्शवला.पाणी गळती रोखण्यासाठी महासंघाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना कराव्यात, संपुर्ण कॅनालचे सिमेंट काँक्र ीटीकरण करावे, अनधिकृत पाणी वापर करणाºयांवर कायदेशीर कार्यवाही करावी, प्रत्येक किलोमीटरला पाणी मोजण्याची व्यवस्था करावी व पाणी गळती थांबवावी अशा सुचना शेतकºयांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाºयांनी यावेळी महासंघाच्या पदाधिकाºयांना दिल्या.या विरोधानंतरही बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. सभेचे सुत्रसंचालन सोमनाथ पताडे यांनी तर आभार रघुनाथ जगताप यांनी मानले. यावेळी लाभ क्षेत्रातील गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो २८ दिंडोरी)