शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

वाघाड कालव्याचे पाणी पाईपलाईनने नेण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:26 IST

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदिंडोरी : मडकीजांब येथील बैठकीत सर्व शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्याबाबत मडकीजांब येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला.वाघाड धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी केला जातो. हातनोरे, निळवंडी, पाडे, मडकीजांब, दिंडोरी, कोराटे, अक्र ाळे, मोहाडी, आंबे दिंडोरी, खतवड , जानोरी, जऊळके दिंडोरी या गावांची शेती या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे. या कालव्याची रब्बी व उन्हाळी आवर्तने शेतीसाठी वरदान ठरत असतात व द्राक्ष शेती सुदधा याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन आहे.या कालव्यावर अनेक वर्षापासुन उचल व प्रवाही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या असुन पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाची निर्मिती केलेली आहे. पाणी वापर संस्थांना त्यांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करून पाणी पुरवण्यात येते व त्या प्रमाणात पाणीपट्टी आकारण्यात येते.अशी परिस्थिती असतांना काही दिवसांपुर्वी वाघाड पाणी वापर महासंघाच्या बैठकीत पाणी गळतीचे कारण देत वाघाड डाव्या कालव्याचे१५ कि. मी. तसेच वाघाड उजवा कालव्याचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने ४५ कि.मी. पर्यंत नेण्याचा ठराव झाल्याची माहीती शेतकºयांना समजली व त्या निर्णयाविरोधात शेतकºयांनी एकत्र येत मडकीजांब येथे बैठक घेऊन या निर्णयास कडाडून विरोध दर्शविला आहे.यावेळी वाघाड पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष तुषार वसाळ, उपाध्यक्ष मधुकर पवार, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत राजे, प्रकाश वडजे, दिनकर जाधव, दत्तात्रय जाधव, दिलीप जाधव, बाळासाहेब मुरकुटे, कैलास पाटील, बाळासाहेब धुमणे, रमेश वडजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी अंबादास पाटील, सोमनाथ बोरस्ते नरेश देशमुख आदींसह शेतकºयांनी मनोगतातून प्रस्तावित पाईपलाईन योजनेस विरोध दर्शवला.पाणी गळती रोखण्यासाठी महासंघाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना कराव्यात, संपुर्ण कॅनालचे सिमेंट काँक्र ीटीकरण करावे, अनधिकृत पाणी वापर करणाºयांवर कायदेशीर कार्यवाही करावी, प्रत्येक किलोमीटरला पाणी मोजण्याची व्यवस्था करावी व पाणी गळती थांबवावी अशा सुचना शेतकºयांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाºयांनी यावेळी महासंघाच्या पदाधिकाºयांना दिल्या.या विरोधानंतरही बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. सभेचे सुत्रसंचालन सोमनाथ पताडे यांनी तर आभार रघुनाथ जगताप यांनी मानले. यावेळी लाभ क्षेत्रातील गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो २८ दिंडोरी)