शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:22 IST

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे.

नाशिक : बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे. विशेष म्हणजे विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियाही अजून सुरू असल्याने पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उपलब्ध जागेवर प्रवेश मिळविणे शक्य होणार आहे.महाराष्ट्र सरकारच्या सततच्या शैक्षणिक धोरणामुळे यावर्षी प्रवेशप्रक्रियेला दिरंगाई झाली असून, ही दिरंगाई पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रवेशप्रक्रियेच्या प्रारंभीच्याच काळात आॅनलाइन प्रवेश प्रणालीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पारंपरिक विद्याशाखांसह व्यावसायिक शाखांतील पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून, या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.यंदा सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला आहे. राज्यातील पूरस्थितीचा फटकाही प्रवेशप्रक्रियेला बसला असून, अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठासह विविध स्वायत्त महाविद्यालयांमधील शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे.शिक्षण मंडळाने नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळामार्फ त जुलै व आॅगस्ट २०१९ महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नाशिक विभागाचा सुमारे ३ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना लांबलेल्या प्रवेशप्रक्रियेचा फायदा होणार असून, विविध अभ्यासक्रमाच्या उर्वरित टप्प्यांमध्ये या विद्यार्थांना सहभागी होता येणार आहे.दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी व मार्च २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, मुख्य परीक्षेत यंदा निकालाची टक्केवारी घसरल्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे आॅक्टोबरऐवजी १७ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत पुरवणी परीक्षा घेतली होती. यातून उत्तीर्ण झालेल्या ३ हजार ८९८ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकता येणार आहे. बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (डिप्लोमा) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने येथेही विद्यार्थ्यांना संधी असेल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी