शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाची उघडीप; रोपवाटिकेत शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:05 IST

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देटमाटा रोपांची कमतरता : पंचनाम्यासाठी यंत्रणेची प्रतीक्षा

मातोरी : पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप न दिल्याने अनेक शेतकºयांनी पावसातच टमाटा पिकाची लागवड केली होती. परंतु गेल्या आठवड्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने टमाटा रोपांची कुज होऊन मोठे नुकसान झाले आहे, तर काही शेतकºयांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी लागवड केलेली पिकेच वाहून गेली आहे. यंदा शेतीपिकांचे पहिल्यांदाच मोठे नुकसान झालेले असताना हताश झालेल्या शेतकºयांमध्ये पावसाने दोन दिवसांपासून दिलेल्या उघडीपीमुळे जोष संचारला असून, सर्वच शेतकरी शेतात जोमाने कामाला लागल्याचे दिसू लागले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असले व सरकारकडून अद्यापही पंचनामे झालेले नसले तरी, त्यासाठी किती दिवस वाट पहायची, असा सवाल शेतकरी करीत आहे. सरकारी कामाची दिरगाई हा नेहमीचा अनुभव असल्यामुळे यंदा पुरामुळे बाधित शेतकºयांनी पंचनाम्याची वाट न पाहता नवीन पिकांचा शोध सुरु केला आहे. पंचनाम्यासाठी वाट पाहिल्यास हंगाम हातचा निघून जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे. त्यामुळे सरकार पिकाचे पंचनामे करेल तेव्हा करेल त्याची वाट न पाहता शेतकºयांनी नवीन लागवड तर काही ठिकाणी रोपे पुनर्लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकºयांची रोपे घेण्यासाठी नर्सरीत गर्दी वाढली आहे. परिणामी नर्सरीत रोपांचा मोठा तुटवडा भासू लागला असून, अनेकांनी टमाटा लागवडीचे नियोजनच बदलत असल्याचे सागितले.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती