शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वंचित तरुणाईला कृतिशील करणारे मुक्त विद्यापीठ मार्चमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:35 IST

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.दक्षिणायन या संस्थेच्या माध्यमातून दक्षिणेत आणि आता महाराष्टÑातही युवकांच्या भावभावना समजावून घेणाºया डॉ. गणेश देवी यांनी सद्यस्थितीचे विवेचन करून युवकांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ शहरी, सोशल मीडियात गुरफटलेला तरुण हे आजच्या नव्या पिढीचे साकारले जाणारे चित्र. कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या मागे घोषणा देत, कधी त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत ऐन उमेदीची वर्षे वाया घालवणारी पिढी भानावर येते तेव्हा काही करण्यासावरण्याची वेळ निघून गेलेली असते. त्याशिवाय नवीन व्यसने, सोशल मीडिया, व्हर्च्युअल जगात वावरणारी आजची पिढी असे एक चित्र दिसून येते, परंतु समाजातील असाही युवा वर्ग आहे जो राजकारण, व्यवस्था, अपुरी साधनसामग्री आणि मूलभूत विषयांसाठीच संघर्ष करतो आहे. त्यांचे प्रश्न हे फार वेगळे आहेत, त्यांच्याकडे राजकारण- सोशल मीडियासाठी वेळ नाही. मात्र शिक्षण-रोजीरोटीसाठी रोजच लढाई करावी लागत आहे अशांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांचा जाहीरनामा ऐकून घेण्यासाठी डॉ. गणेश देवी यांनी आधी कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्टÑातही युवकांशी गटचर्चा ऐकून त्यांचा जाहीरनामा तयार करण्याचे काम हाती घेतले. अन्य राज्यांतही त्याची तयारी सुरू आहे. त्यातून युवा पिढीच्या माध्यमातून व्यवस्था किंवा सुविधांमध्ये बदल करण्यासाठी त्यांना राजकारण, चळवळी यापेक्षा वेगळा मार्ग शोधला आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. चळवळी किंवा राजकारण हा मार्ग अनुसरणाºयांना माझा नकार नाही, मात्र शिक्षणातून ही स्थिती बदलता येऊ शकते, या विषयावर मी अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहे, त्यातून लोकमान्य विद्यापीठाची नवी संकल्पना माझ्या डोक्यात घोंगावत होती. आता राज्यातील ठिकठिकाणी असलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर त्याची गरज आणि उपयुक्तता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विचारांचे आणि ज्ञानाचे मुक्त विद्यापीठ असेल, परंतु त्याला कायद्याच्या चाकोरीचे आणि परंपरेचे बंधन नसेल. त्याचे एक ठिकाण नसेल तर गावागावांत ते असेल. गावातील सुजाण नागरिक आणि अभ्यासक त्याचे नियंत्रण करतील. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेला कोणीही त्यात ज्ञानार्जन करू शकेल, त्यामुळे त्याला वयाचे आणि किमान शिक्षणाचे बंधन नाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माधयमातून पुस्तके या वंचितांपर्यंत पोहोचवता येईल. यात भूगोल- इतिहास नाही. उथळपणाने विरोध नाही की कोणत्या विचारांचे समर्थन नाही. स्वातंत्र्य, समता, संस्कृती, अभिव्यक्ती, पर्यावरण संतुलन असे विचारशील आणि कृतिशील शिक्षण असेल. अशा या वेगळ्या विद्यापीठाची घोषणा येत्या मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. महाराष्टÑातील विचारांची मशागत संतांनी केली आहे. यामुळे अशाप्रकारचे मुक्त शिकवण आणि प्रबोधन करणारे हे लोक विद्यापीठ यशस्वी होईल, असा विश्वासही डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक