शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

वंचित तरुणाईला कृतिशील करणारे मुक्त विद्यापीठ मार्चमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:35 IST

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राजकारण, बदलती आलिशान लाइफ स्टाइल, सोशल मीडिया यात अडकलेल्या युवा पिढीच्या पलीकडे असाही वर्ग आहे की, ज्याची जगण्याची धडपड वेगळी आणि विषयही वेगळे आहेत. अशा युवकांसाठी ही परिस्थिती अनुरूप नसली तरी ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ शकते. त्यांना ज्ञानातून त्यांच्या अंगीभूत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी भाषा आणि संस्कृतीतज्ज्ञ तसेच विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी अनोखा मार्ग शोधला आहे. विचारांची देवाण- घेवाण करणारे अनोखे मुक्त विद्यापीठ तयार होणार असून, पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळा ढाचा असणारे हे विद्यापीठ एका ठिकाणी नसेल आणि कोण एक कुलपती, कुलगुरूही नसेल. शासनाच्या मान्यतेशिवाय स्थापन झालेले हे समाजमान्य विद्यापीठ असणार आहे. या नवोेपक्रमाची पायाभरणी संतभूमी महाराष्टÑातच होणार असून, येत्या मार्च महिन्यात त्याची घोषणा होणार आहे.दक्षिणायन या संस्थेच्या माध्यमातून दक्षिणेत आणि आता महाराष्टÑातही युवकांच्या भावभावना समजावून घेणाºया डॉ. गणेश देवी यांनी सद्यस्थितीचे विवेचन करून युवकांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ शहरी, सोशल मीडियात गुरफटलेला तरुण हे आजच्या नव्या पिढीचे साकारले जाणारे चित्र. कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या मागे घोषणा देत, कधी त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत ऐन उमेदीची वर्षे वाया घालवणारी पिढी भानावर येते तेव्हा काही करण्यासावरण्याची वेळ निघून गेलेली असते. त्याशिवाय नवीन व्यसने, सोशल मीडिया, व्हर्च्युअल जगात वावरणारी आजची पिढी असे एक चित्र दिसून येते, परंतु समाजातील असाही युवा वर्ग आहे जो राजकारण, व्यवस्था, अपुरी साधनसामग्री आणि मूलभूत विषयांसाठीच संघर्ष करतो आहे. त्यांचे प्रश्न हे फार वेगळे आहेत, त्यांच्याकडे राजकारण- सोशल मीडियासाठी वेळ नाही. मात्र शिक्षण-रोजीरोटीसाठी रोजच लढाई करावी लागत आहे अशांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांचा जाहीरनामा ऐकून घेण्यासाठी डॉ. गणेश देवी यांनी आधी कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्टÑातही युवकांशी गटचर्चा ऐकून त्यांचा जाहीरनामा तयार करण्याचे काम हाती घेतले. अन्य राज्यांतही त्याची तयारी सुरू आहे. त्यातून युवा पिढीच्या माध्यमातून व्यवस्था किंवा सुविधांमध्ये बदल करण्यासाठी त्यांना राजकारण, चळवळी यापेक्षा वेगळा मार्ग शोधला आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. चळवळी किंवा राजकारण हा मार्ग अनुसरणाºयांना माझा नकार नाही, मात्र शिक्षणातून ही स्थिती बदलता येऊ शकते, या विषयावर मी अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहे, त्यातून लोकमान्य विद्यापीठाची नवी संकल्पना माझ्या डोक्यात घोंगावत होती. आता राज्यातील ठिकठिकाणी असलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर त्याची गरज आणि उपयुक्तता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विचारांचे आणि ज्ञानाचे मुक्त विद्यापीठ असेल, परंतु त्याला कायद्याच्या चाकोरीचे आणि परंपरेचे बंधन नसेल. त्याचे एक ठिकाण नसेल तर गावागावांत ते असेल. गावातील सुजाण नागरिक आणि अभ्यासक त्याचे नियंत्रण करतील. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेला कोणीही त्यात ज्ञानार्जन करू शकेल, त्यामुळे त्याला वयाचे आणि किमान शिक्षणाचे बंधन नाही. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माधयमातून पुस्तके या वंचितांपर्यंत पोहोचवता येईल. यात भूगोल- इतिहास नाही. उथळपणाने विरोध नाही की कोणत्या विचारांचे समर्थन नाही. स्वातंत्र्य, समता, संस्कृती, अभिव्यक्ती, पर्यावरण संतुलन असे विचारशील आणि कृतिशील शिक्षण असेल. अशा या वेगळ्या विद्यापीठाची घोषणा येत्या मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. महाराष्टÑातील विचारांची मशागत संतांनी केली आहे. यामुळे अशाप्रकारचे मुक्त शिकवण आणि प्रबोधन करणारे हे लोक विद्यापीठ यशस्वी होईल, असा विश्वासही डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक