शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

साईबाबा मंदिर खुले करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

येवला : श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे, ग्रामपंचायत दिवाबत्ती बिल भरणा पंधराव्या वित्त आयोगाऐवजी महाराष्ट्र शासनाने करावा, अशी ...

येवला : श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे, ग्रामपंचायत दिवाबत्ती बिल भरणा पंधराव्या वित्त आयोगाऐवजी महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी भाजप नेते बाबा डमाळे पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. कोश्यारी यांची दिल्ली निवासस्थानी बाबा डमाळे पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. साई भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना कोविड संदर्भात नियम व अटी लागू कराव्यात, शिर्डी साई मंदिर खुले केल्यास शिर्डीतील ठप्प झालेले व्यवसाय पुन्हा सुरळीत होतील, भक्तांना दर्शन होईल, व्यावसायिकांचे थंडावलेले व्यवहार सुरळीत होतील, असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत विकासासाठी केंद्र सरकारचा वित्त आयोग हा महत्त्वाचा निधी थेट ग्रामपंचायतींना कृती आराखड्यानुसार वापरता येतो. त्या माध्यमातून गावचा विकास होण्यासाठी मोठी मदत होते. ग्रामपंचायत गावांतर्गत दिवाबत्ती व्यवस्था हा खर्च पूर्वी जिल्हा परिषद करत असे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने काही भार उचलला होता. परंतु, नव्याने महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने दिवाबत्ती खर्च पंधराव्या वित्त आयोगातून करावा व थकबाकीची वीज बिले भरावीत असे आदेश केलेले आहेत. त्यानुसार वीज थकबाकीच्या रकमा लहान ग्रामपंचायतींना भरणे परवडणारे नाही. कारण जेवढा वित्त आयोगाचा निधी आहे, तेवढाच निधी जवळजवळ दिवाबत्तीवर खर्च होणार आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी वित्त आयोगातून निधी शिल्लक राहणार नाही, म्हणून हा खर्च महाराष्ट्र सरकारने करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.

चर्चेत डमाळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना या बाबी लक्षात आणून दिल्या असता याप्रश्‍नी लक्ष घालण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. याप्रसंगी डमाळे यांच्यासमवेत अमोल सोनवणे, संतोष वलटे, वृशाल डमाळे उपस्थित होते. (१४ येवला १)

140821\14nsk_29_14082021_13.jpg

१४ येवला १