शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवसमाज निर्मितीकडे होणारी वाटचाल हेच वारीचे संचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:39 IST

पंढरपूरची वारी ही खरी महाराष्टÑाची लोकसंस्कृती आहे. या वारीत खऱ्या अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडते. वारीचे रूप आपल्याला विराट आणि विस्तीर्ण दिसते. कारण महाराष्टÑातील खेड्यापाड्यांतून आणि वाडी-वस्त्यांमधून वारकरी या वारी सोहळ्यात सहभागी होतात. अनेक जण तन- मन-धनाने यात सामील होतात.

ठळक मुद्देदूरवरच्या भागातून पंढरीच्या दिशेने शेकडो मैल चालत राहतात.

 

 

 

 

 

पंढरपूरची वारी ही खरी महाराष्टÑाची लोकसंस्कृती आहे. या वारीत खऱ्या अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन आपल्याला घडते. वारीचे रूप आपल्याला विराट आणि विस्तीर्ण दिसते. कारण महाराष्टÑातील खेड्यापाड्यांतून आणि वाडी-वस्त्यांमधून वारकरी या वारी सोहळ्यात सहभागी होतात. अनेक जण तन- मन-धनाने यात सामील होतात. महाराष्टÑातील अनेक भागात त्या त्या भागातील संतांच्या पालख्यांसमवेत वारकऱ्यांच्या दिंड्या दरकोस दर मुक्काम चालत राहतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी निघते, तर देहूहून संत तुकोबारायांची पालखी मार्गस्थ होते. त्र्यंबकहून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी येते. त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पालख्या मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा दूरवरच्या भागातून पंढरीच्या दिशेने शेकडो मैल चालत राहतात. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश अशा विविध प्रांतांमधूनदेखील वारकरी वाहनांमधून पंढरपुरात दाखल होतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रांताच्या सीमेवर महाराष्टÑातील हे तीर्थक्षेत्र अन्य भाषिक राज्यातील लोकांचे तीर्थस्थान आहे. किंबहुना पिढ्यान पिढ्यापासून ‘विठ्ठल’ हे त्यांचे दैवत आहे. पद्मपुराणात पंढरपूरचा अपूर्व महिमा गायला आहे. पंढरपूरची मूर्ती ही स्थापन केलेली नाही तर स्वयंभूआहे, असाही उल्लेख काही ग्रंथांमध्ये केलेला आढळतो.महत्त्वाची गोष्ट ही आहे की, पंढरपूरची वारी आणि वारकरी पंथ अनादी आहे. महाराष्टÑाची संपूर्ण लोकसंस्कृती वारकरी संप्रदायात सामावलेली आहे. महाराष्टÑात आज अनेक पंथ, संप्रदाय आहेत, परंतु वारकरी संप्रदायाचा विस्तार अगदी खेड्यापाड्यात झालेला आहे. जुने जाणते लोक तर वारकरी संप्रदायात आहेतच, परंतु नवतरुणदेखील या वारकरी संप्रदायात सहभागी होत आहेत. याला एक कारण म्हणजे वारी होय. मी स्वत: वयाच्या १८ वर्षांपासून सहभागी होत आहे आणि त्याची अतिशय चांगली अनुभूती घेत आलो आहे.गेली ५० वर्षे मी पंढरीची वारी करीत आहे. वारीमध्ये आम्हाला खºया अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन घडते. वारकरी संप्रदाय सर्व जाती, पंथ आणि धर्माचेदेखील संत होऊन गेले आहेत. वारकरी संप्रदायातील संतांनी नेहमी मानव कल्याणाचा आणि विश्वकल्याणाचा विचार मांडला आहे. तरुण कीर्तनकार, प्रवचनकार वारीमध्ये याच संतविचारांचा प्रचार आणि प्रसार करीत असतात.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो.त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो.वारीमध्ये सहभागी झालेले भाविक खेड्यापाड्यातून आलेले असून अशिक्षित असले तरीही त्यांच्यात सर्व निती नियमांची जाणीव असते़ त्यामुळे वारीच्या नियमाचे ते पालन करतात़ पांडुरंगावर भाव ठेवून नियमितपणे ते वाटचाल करत राहतात़ त्याचवेळी ठिकठिकाणी दिंडीत सहभागी झालेले वारकरी हा संतांचा विचार ऐकत चालत राहतात. पंढरपूरनजीक वाखारी येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र जमतात, ‘संत सज्जनांचा जमला मेळा, अवघा रंग एक झाला’ असा तो अनुपम्य सोहळा असतो. वारकरी हा पंढरीकडे वाटचाल करतो म्हणजे तो केवळ वाट चालत नाही तर नवसमाजनिर्मितीची वाट दाखवितो, असे म्हणावे लागेल आणि हेच वारीचे संचित आहे.(लेखक संत साहित्याचेअभ्यासक आहेत.) डॉ. रामकृष्ण महाराजलहवितकर