शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:35 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले.

ठळक मुद्देपंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कडाक्याचे ऊन व लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेत पाच टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, पंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. नाशिक शहरासह मराठवाडा, नगर या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले. शिवाय मराठवाडा, नगर या जिल्ह्यांचे आवर्तनही सोडण्यात आले. जानेवारी महिन्यांपासून जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली, शिवाय कडक उन्हाळा सुरू झाल्याने धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मान्सून लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गंगापूर धरणात १५ टक्के जलसाठा असून, समूहात १० टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सहा टक्क्याने जलसाठा घटला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक