शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:35 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले.

ठळक मुद्देपंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कडाक्याचे ऊन व लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेत पाच टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, पंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. नाशिक शहरासह मराठवाडा, नगर या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले. शिवाय मराठवाडा, नगर या जिल्ह्यांचे आवर्तनही सोडण्यात आले. जानेवारी महिन्यांपासून जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली, शिवाय कडक उन्हाळा सुरू झाल्याने धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मान्सून लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गंगापूर धरणात १५ टक्के जलसाठा असून, समूहात १० टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सहा टक्क्याने जलसाठा घटला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक