शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नाशकातील केवळ ८ टक्के युवक करतात डाएट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 16:48 IST

नाशिक- हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डबा संस्कृती कमी होताना दिसत आहे. हल्ली सकस आहारापेक्षा बाहेरचं मसालेदार, चमचमीत खाण्याकडे तरूणाईचा कल वाढला आहे असे एका सर्वेक्षणात आढळून आले. एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स महाविद्यालयातील पत्रकरिता व जनसंज्ञापन विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तरूणाईच्या बदलत्या खाण्याच्या सवयी या विषयावर विभाग प्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण केले.

ठळक मुद्देएचपीटी महाविद्यालयाचे सर्वेक्षण५० टक्के विद्यार्थ्यांना आवडते बाहेरचे खाणे७ टक्के विद्यार्थी चवीला देतात महत्व

नाशिक- हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डबा संस्कृती कमी होताना दिसत आहे. हल्ली सकस आहारापेक्षा बाहेरचं मसालेदार, चमचमीत खाण्याकडे तरूणाईचा कल वाढला आहे असे एका सर्वेक्षणात आढळून आले.

एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स महाविद्यालयातील पत्रकरिता व जनसंज्ञापन विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तरूणाईच्या बदलत्या खाण्याच्या सवयी या विषयावर विभाग प्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण केले. विशेष महाराष्ट्रीयन अन्न हे परिपूर्ण मानले जाते. शरीरासाठी आवश्यक ते सगळे पोषक घटक महाराष्ट्रीयन अन्नातून मिळतात. पण तरीही हल्ली तरूणाई महाराष्ट्रीयन अन्नापेक्षा जंकफूड, साऊथ इंडियन, चाट, इटालियन, चायनीज या पदार्थांना अधिक पसंती देतात. पोहे, उपमा, आप्पे या महाराष्ट्रीयन पदार्थांपेक्षा विद्यार्थी मॅगी, समोसा चाट, इडली या पदार्थांना नाश्ता करतेवेळी प्राधान्य देतात.दीक्षीत -दिवेकर डाएटची सगळीकडे चर्चा असली तरी केवळ ८ टक्के विद्यार्थी हे डाएट करतात. तर ८४ टक्के विद्यार्थी हे डाएट करत नाहीत. प्रत्येकावर समाजमाध्यमांवरील पोस्टचा परिणाम होत असतो. खाद्यपदार्थांविषयी पोस्ट वाचून ५२ टक्के विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयीत बदल होतो तर ४८ टक्के विद्यार्थ्यांंमध्ये कोणताही बदल होत नाही असे निदर्शनास आले.हल्ली आॅनलाइन फूडचा पर्यायही उपलब्ध असतो. ३० टक्के विद्यार्थी आॅनलाइन फूडचा वापर करतात. तर वेळ, स्वच्छता याचा विचार करून ३४ टक्के विद्यार्थी हा पर्याय नाकारतात. इतर ३६ टक्के विद्यार्थी गरजेनुसार या पर्यायाचा वापर करतात. ८४ टक्के विद्यार्थी बाहेर खाताना स्वच्छतेकडे लक्ष देतात. तर ७ टक्के विद्यार्थी चवीला अधिक महत्त्व देतात. उर्विरत ९ टक्के विद्यार्थी इतर घटकांबरोबर स्वच्छतेलाही महत्त्व देतात.स्वच्छतेबरोबर सकस, पोषक घटकांना ७४ टक्के विद्यार्थी महत्त्व देतात. तर निव्वळ ७ टक्के विद्यार्थी या घटकांना दुय्यय मानतात. उरलेले १९ टक्के विद्यार्थी प्रत्येक वेळी नाही पण बर्याचदा या घटकांचा विचार करतात.४८ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येण्यापूर्वी नाश्ता करून येतात तर ३४ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात आल्यावर कॅन्टीन किंवा बाहेर नाश्ता करतात. उर्वरीत १८ टक्के विद्यार्थी कधी घरून तर कधी बाहेर नाश्ता करतात. उपहारगृहांमध्ये नाश्ता करताना पोहे, उपमा या महाराष्ट्रीयन पदार्थांपेक्षा मॅगी, समोसा चाट, इडली या पदार्थांना विद्यार्थी पसंती देतात. ५९ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येताना डबा घेऊन येतात तर महाविद्यालयात बसून डबा खायला पुरेशी जागा नसल्याने २४ टक्के विद्यार्थी डबा आणत नसल्याचे सांगतात. ५० टक्के विद्यार्थ्यांना बाहेरचे पदार्थ खायला अधिक आवडतात. तर केवळ ८ टक्के विद्यार्थ्यांना बाहेर खावेसे वाटतं नाही, असे म्हणणे आहे. बाहेरचे अन्नपदार्थ आवडत असले तरी ४० टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की बाहेरचे पदार्थ खाऊन पोट भरत नाही. २३ टक्के विद्यार्थी म्हणतात की पोट भरते. तर उर्विरत तरु णांच्या संमिश्र भावना आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयfoodअन्न