शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चाळीत साठविलेला कांदा सडू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 01:10 IST

आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माळवाडी : आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  चांगला भाव मिळेल, या उद्देशाने अनेक शेतकºयांनी मार्च महिन्यापासून कांदा चाळीत साठवला होता. कांदा चाळीत साठवलेला असल्याने खरिपासाठी कर्ज घेऊन शेतकºयांनी शेतीसाठी भांडवल उभे केले.कांदा भाववाढीची शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांदा भावात घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंतित आहेत. १५ आॅगस्टच्या आधी सरासरी ११६० रूपये प्रति क्विंटलने विकला जाणारा उन्हाळ कांदा आज सरासरी ७८० रूपये प्रति क्विंटल या भावाने विकला जात आहे. कांद्याला चार पैसे तर मिळालेच नाहीत नाही; पण आता चाळीतील कांदा पूर्णत: पोकळ होऊ लागला आहे. काही ठिकाणी सडू लागला आहे. कांदा भाव ८५० ते ९५० रूपयांपेक्षा जास्त नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवा कांदा अजून बाजारात दाखल न झाल्याने चाळीत कांदा ठेवावा की विकावा, चाळीत कांदा सडला तर काय करायचे, असे प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाले आहेत. कांदा भावात सरासरी ५०० ते ६०० रूपये घसरणीचा फटका बसत असला तरी चाळीतील कांदा सडणे व वजन घटू लागल्याने आता कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा