शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा घसरला; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:13 IST

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देयेवला : निर्यातबंदी उठविण्याची मागणी; खर्च भरून निघेना

राजापूर : येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. खर्चही भरून निघेल की नाही, याची चिंता सतावत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. पांढऱ्या सोन्याला फक्त पाच हजारापर्यंत दर असून, व्यापारी मनाचा दर शेतकऱ्यांना देत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकºयाची आहे, परंतु सध्या लागवड केलेल्या कांदा लागवडीमध्ये साधारण शेतकºयांची दहा गुंठ्यापासून तर एक एकरापर्यंत कांदा लागवड झालेली आहे. उत्पादनही भरघोस निघाले आहे, मात्र दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.राजापूर येथे सध्या थोड्याफार प्रमाणात का होईना कांदा काढणीला सुरु वात आहे. त्यातच मजुरीचे दर हे वाढल्याने अडचणीत भर पडली आहे. यावर्षी हवामान बदलामुळे कांदा पिकाला जगविण्यासाठी कीटकनाशक व फवारणीचा मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असताना या हजार ते पंधराशे रु पये दरामध्ये केलेला खर्च वसूल होतो की नाही यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळेल असे धोरण अवलंबून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी सध्या शेतकºयांची आहे.सध्या कांद्याचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने कांद्याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे, परंतु दर कमी होत असल्याने केलेला खर्चही वसूल होतो की नाही, याची चिंता लागली आहे. हजार ते पंधराशे रु पये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवावी, जेणेकरून शेतकºयांना दोन पैसे मिळतील व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.- गोकुळ वाघ, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा