शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

चाळीत साठवलेला कांदा असुरक्षित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:35 IST

कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला ...

ठळक मुद्देचोरीचे सत्र सुरूच : उत्पादक शेतकरी हैराण; चोरट्यांचा डल्ला

कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला आहे, त्यांना चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. मात्र आता कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे चोरट्यांची त्यावर वक्रदृष्टी पडली असून, कळवण तालुक्यात भेंडी शिवारात एक लाख २५ हजार रुपयांचा २५ क्विंटल कांदा चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री घडली.येथील राजकुमार देवरे यांची नवी बेज व भेंडी शिवारात शेती आहे. भेंडी शिवारातील शेतातील चाळीत कांदा साठवणूक केली आहे. कांदा चाळीतून एक लाख २५ हजार रुपये किमतीचा साठवलेला २५ क्विंटल कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलीस कर्मचारी बोरसे, घरटे यांनी भेट देऊन कांदा चाळीची पाहणी व पंचनामा केला, पिकअप वाहनातून कांदा चोरी झाल्याचा पोलिसांचा कयास असून, वाहतूक मार्गावरून माहीतगार व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.बुधवारी (दि. ४) सकाळी शेतातील सालदार रामदास माळी निकम यांच्या निदर्शनास ही बाब आली. कळवण पोलीस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची फिर्याद दिली.राजकुमार देवरे यांनी मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले. बाजारात कांद्याच्या दरात चढउतार होत असल्याने व निश्चित भाव नसल्याने भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील व आपल्याला भाववाढीचा फायदा होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने देवरे यांनी भेंडी शिवारातील शेतातील चाळीत २५० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. मंगळवारी (दि. ३) अज्ञात चोरट्यांनी चाळीचा दरवाजा व जाळी तोडून चाळीतुन २५ क्विंटल कांदा लंपास केला. आजच्या बाजारभावानुसार ५००० रुपये क्विंटलप्रमाणे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा कांदा चोरी गेला आहे.चाळींवर गस्त...यंदा कांद्याला समाधानकारक भाव असल्याने आता चोरट्यांनी या लाल सोन्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणीदेखील कांदा चोरीच्या घटना समोर आल्याने शेतकऱ्यांना रात्री जागून कांदा चाळ राखावी लागते आहे. 

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी