शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कांदा साठ्याची आता दररोज होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:21 IST

लासलगाव : कांदा साठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले असून, कांदा साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाची करडी नजर । अतिरिक्त साठा दिसल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : कांदा साठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले असून, कांदा साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी (दि. ६) आदेश जारी करून महाराष्ट्रातील सर्व कांदा साठा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा पुरवठा विभागाचे पी. टी. महाजन यांनी लासलगाव येथे स्थानिक महसूल मंडल निरीक्षक व तलाठी यांच्यासोबत साठा तपासणी केली आहे.शासनाने यापूर्वीच दि. ३ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी करून साठवणुकीवर असलेली मर्यादा घटविली आहे. राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर किरकोळ विक्र ेत्यांना पाच टनापेक्षा जास्त कांद्याचा साठा ठेवता येणार नाही. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुक्यातील कांदा साठा तपासणी दररोज करून अद्ययावत साठा माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी निफाड तालुक्यातील महसूल मंडल निरीक्षक यांनी कांदा साठवणुकीची सविस्तर माहिती अहवालात देण्याचे व अतिरिक्त साठा दिसल्यास लागलीच जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसंवत, विंचूर, निफाड, सायखेडा यांसह खेरवाडी भागातही ही तपासणी त्या-त्या स्थानिक महसूल मंडळ निरीक्षक यांना दररोज तपासणी करून किती खरेदी व कांदा पाठवणी झाली याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच अतिरिक्त साठा दिसला तर लागलीच स्थानिक पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल पाठवावा लागणार आहे.दरम्यान लासलगाव परिसरातील कांदा खरेदीदार व्यापारी यांच्या कांदा खळ्यावर किती कांदा आहे व शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक साठा आहे का याबाबत निफाड येथील सहकार खात्याचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या विशेष पथकाने अचानक पाहणी करून तपासणी केली. साठेबाजांवर निर्बंधसध्या बाजारात कांद्याचा तुटवडा असून, कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे हे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नवी उपाययोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाºयांना जास्त कांदा साठवून ठेवता येणार नाही. घाऊक आणि किरकोळ व्यापाºयांसाठी असलेली कांदा साठविण्याची मर्यादा ५० टक्क्यांनी घटवून अनुक्र मे २५ आणि पाच टक्के करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा