शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात कांदा गडगडला ;संतप्त शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 18:58 IST

 कांद्याला भाव नसल्यामुळे बागलाण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे. गुरु वारी कांद्याला शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. यावेळी संचालक मंडळ व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकºयांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन सटाणा मालेगाव रस्ता दीड तास रोखून धरला.

यावेळी एका शेतकºयाने ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्यात येत असताना त्या दिवशी त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यात कांदा आंदोलन पेटले असून शेतकºयांची समजूत घालताना प्रशासनाच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. आगामी काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. बागलाण तालुक्यात पावसाळी रांगडी व उन्हाळी अशा तिन्ही प्रकारच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.त्यापैकी उन्हाळी कांद्याची चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते.या वर्षी जवळपास संपूर्ण वर्षभर कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने कांदा चाळीतच खराब झाला आहे.दुसरीकडे शेतातील नवीन मालालाही बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.अशातच गुरु वारी (दि.२४) येथील बाजार समतिीत कांदा लिलाव सुरू होताच येथील मुंजवाड येथील गोकुळ पवार या शेतकºयाच्या नवीन कांद्यास शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला.इतर शेतकºयांनाही हाच अनुभव येत असल्याने संतप्त शेतकºयांनी बाजार समिती सभापती व सचिवांच्या कार्यालयात जाऊन याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला.यावेळी शासनाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देत शेतकºयांनी तब्बल दीड तास तास वाहतूक रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी