शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सटाण्यात कांदा गडगडला ;संतप्त शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 18:58 IST

 कांद्याला भाव नसल्यामुळे बागलाण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे. गुरु वारी कांद्याला शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. यावेळी संचालक मंडळ व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकºयांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन सटाणा मालेगाव रस्ता दीड तास रोखून धरला.

यावेळी एका शेतकºयाने ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्यात येत असताना त्या दिवशी त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यात कांदा आंदोलन पेटले असून शेतकºयांची समजूत घालताना प्रशासनाच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. आगामी काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. बागलाण तालुक्यात पावसाळी रांगडी व उन्हाळी अशा तिन्ही प्रकारच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.त्यापैकी उन्हाळी कांद्याची चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते.या वर्षी जवळपास संपूर्ण वर्षभर कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने कांदा चाळीतच खराब झाला आहे.दुसरीकडे शेतातील नवीन मालालाही बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.अशातच गुरु वारी (दि.२४) येथील बाजार समतिीत कांदा लिलाव सुरू होताच येथील मुंजवाड येथील गोकुळ पवार या शेतकºयाच्या नवीन कांद्यास शंभर रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला.इतर शेतकºयांनाही हाच अनुभव येत असल्याने संतप्त शेतकºयांनी बाजार समिती सभापती व सचिवांच्या कार्यालयात जाऊन याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला.यावेळी शासनाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देत शेतकºयांनी तब्बल दीड तास तास वाहतूक रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी