शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कांदा बीज उत्पादनाला यंदा बसणार मधमाश्यांच्या कमतरतेमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:01 IST

चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देपरिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.

आकाश गायखेचांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.मागीलवर्षी निर्माण झालेली पाणीटंचाई, तसेच दरवर्षी पिकांवर फवारणीसाठी वापरलेली औषधे, कीटकनाशके यामुळे गोदाकाठ व निफाड तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे.गत सहा महिन्यांपासून कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने चांदोरी, सायखेडा, चाटोरी, करंजगाव, खेरवाडी, सुकेणे, कोठुरे, पिंपळस, चितेगाव, दारणासांगवी, लालपाडी, बेरवाडी, निफाड, मांजरगाव, रवळस तसेच निफाड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांनी रब्बी हंगामात कांदा बीजची लागवड केली. सध्या पीक चांगले बहरले आहे, मात्र त्यांचे परागीकरण करणाºया मधमाश्या नसल्याने कांदा बीज उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण अधिक होते तेव्हा मोहोळ काढून मध विक्र ी करणाºयांची संख्या अधिक होती, पण गेल्या दोन वर्षांपासून मधमाश्यांचे मोहोळ दिसत नाही. त्यामुळे गावरान मध मिळत नाही. हे मध अनेक आजारांवर गुणकारी आहे.मधमाश्या कमी होण्याची कारणेमागील वर्षी असलेली पाणीटंचाई तसेच पिकांवर फवारली जाणारी विविध औषधे, तणनाशके यामुळे दिवसेंदिवस मधमाश्या कमी होत आहेत. यावर्षी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी मधमाश्या दिसत नाही. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.आपल्या भागातील मधमाश्या कमी झाल्यामुळे अनेक पिकांचे परागीकरण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.- कैलास हांडगे, कांदा उत्पादक शेतकरी, चाटोरी.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी