शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बीज उत्पादनाला यंदा बसणार मधमाश्यांच्या कमतरतेमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:01 IST

चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देपरिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.

आकाश गायखेचांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.मागीलवर्षी निर्माण झालेली पाणीटंचाई, तसेच दरवर्षी पिकांवर फवारणीसाठी वापरलेली औषधे, कीटकनाशके यामुळे गोदाकाठ व निफाड तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे.गत सहा महिन्यांपासून कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने चांदोरी, सायखेडा, चाटोरी, करंजगाव, खेरवाडी, सुकेणे, कोठुरे, पिंपळस, चितेगाव, दारणासांगवी, लालपाडी, बेरवाडी, निफाड, मांजरगाव, रवळस तसेच निफाड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांनी रब्बी हंगामात कांदा बीजची लागवड केली. सध्या पीक चांगले बहरले आहे, मात्र त्यांचे परागीकरण करणाºया मधमाश्या नसल्याने कांदा बीज उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण अधिक होते तेव्हा मोहोळ काढून मध विक्र ी करणाºयांची संख्या अधिक होती, पण गेल्या दोन वर्षांपासून मधमाश्यांचे मोहोळ दिसत नाही. त्यामुळे गावरान मध मिळत नाही. हे मध अनेक आजारांवर गुणकारी आहे.मधमाश्या कमी होण्याची कारणेमागील वर्षी असलेली पाणीटंचाई तसेच पिकांवर फवारली जाणारी विविध औषधे, तणनाशके यामुळे दिवसेंदिवस मधमाश्या कमी होत आहेत. यावर्षी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी मधमाश्या दिसत नाही. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.आपल्या भागातील मधमाश्या कमी झाल्यामुळे अनेक पिकांचे परागीकरण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.- कैलास हांडगे, कांदा उत्पादक शेतकरी, चाटोरी.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी