शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:34 IST

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला.

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला. बाजारभावातील घसरण थांबविण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर गुरूवारी सकाळी लाल कांदा आवक १५०४८ क्विंटल झाली असून बाजारभाव रु पये प्रति क्विंटल किमान १००० ते कमाल २३५२ व सरासरी २००० रूपये जाहीर झाले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी शंभर रूपयांची कांदा भावात घसरण झाली होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी १२६० वाहनातील १७२४८ क्विंटल आवक झाली. लाल कांदा किमान ९०१ ते कमाल २००१ व सरासरी १७५० रूपये भावाने विक्र ी झाला.तर सोमवारी लासलगांवी २५०४४ क्विंटल लाल कांदा किमान १००० ते कमाल २१११ व सरासरी १८५१ रूपये भावाने विक्र ी झाला होता. आता कांदा निर्यात बंदी उठवली असल्याने कांदा भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे.  बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात घसरन सुरु आहे.अवकाळी पावसाने कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवुन आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करण्याची मागणी होत होती.दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर बंदी उठवली जाईल अशी चर्चा होती. लासलगांव मुख्य बाजार समितीसह, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल अली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर, २०१९ पासुन संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या बाणज्यि व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर, २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणा-या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला होता. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापा-यांना २५० क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापा-यांना २५ क्विंटलपर्यंत (०५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागु केली.----------------------उशीरा की होईना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविली आहे. चीनमधुन कांदा निर्यात बंदी कोरोनामुळे आहे. त्यामुळे परत परदेशी बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम करण्यासाठी ही निर्यात बंदी उठणे फारच गरजेचे होते.आता या निर्णयाचा फायदा लवकरच कांदा बाजार भावात होत असलेली घसरण थांबुन भावात सुधारणा झाली असली तरी अजुन होऊ शकते .-सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक