शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावात दोनशे रूपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 16:08 IST

लासलगाव. - लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दोनशे रूपयांची कांदा भावा सकाळी सत्रात घसरण झाली.सकाळी १२२५ वाहनातील लाल कांदा लिलावात किमान ९५१ ते२०३१ व सरासरी भाव १८०० रूपये या दराने विक्र ी झाला. मागील सप्ताहात गुरूवारी १८३४५क्विंटल लाल कांदा किमान १०००- त कमाल २२११ व सरासरी २०००रूपये भावाने विक्र ी झाला होता.या सप्ताहात कांदा आवक वाढण्याची शक्यता आहे.यात कांदा बाजारपेठेत भाव कोसळले तर कांदा उत्पादकांच्या गोटात आंदोलनाचा पवित्रा घेतला जाण्याची शक्यताव्यक्तकेलीजात आहे.

ठळक मुद्देनिर्यातबंदी :कायम राहिल्यास पुरवठा वाढण्याची शक्यता

लासलगाव येथे मागीलसप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,००,६९४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ९५० कमाल रु पये २,२८७ तर सर्वसाधारण रु पये२,०२७ प्रती क्विंटल राहीले.केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८टक्के , तर उत्पादनात २०टक्के वाढीचे अनुमान आहे.फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादनामुळे बाजारभाव मातीमोल होण्याची शकयताअसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी हटविण्याची आग्रही मागणी राज्यातील शेतकº्यांकडून होत आहे.देशातील रब्बी कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनांपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय फलोत्पादन विभागाने वर्तविला आहे.या पाशर््वभूमीवर, वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांत महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. फलोत्पादन अनुमानात १९-२० हंगाम वर्षांत एकूण कांदा उत्पादन २४४ लाख टन अनुमानित आहे. त्यात खरिप आणिलेट खरीप मिळून ५५ लाख टन तर, रब्बीतून १८९ लाख टन अशी वर्गवारी आहे.साधारपणे मार्च ते आॅक्टोबर मिहन्यात देशात रब्बी कांद्याचा पुरवठा असतो. मार्च महिन्यात लेट खरीप (रांगडा) आणि रब्बी (उन्हाळ) एकाचवेळी काढणी व व विक्र ीला येऊन महाराष्ट्रासह देशभरातील बाजार समित्यांत मालाची आवक वाढण्याची शक्यता व्यक्तकेलीजातआहे. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत अनुक्र मे खरीप आणिरेट खरीप कांदा बाजारात असतो. खरीप कांद्यात टिकवण क्षमता नसते. त्याची विक्र ी करावी लागते. रब्बी कांदा टिकवण क्षमता असते. पारंपरिक कांदा चाळीत सहा ते आठ महिने रब्बी कांदा साठवता येतो. यावर्षी उत्पादनवाढीची मोठी समस्या ही रब्बी कांद्यात निर्माण होणार आहे.आता लेट खरीप कांद्याची आवक होत आहे. यंदा लेट खरीपाचे (रांगडा) उत्पादन कमी असल्याने सध्याचे बाजारभाव फेब्रुवारी २०१९ तुलनेत चढे आहेत. लेट खरीपाचा कांदा मार्चच्या मध्यापर्यंत बाजारात सुरू असतो. कांदा बाजारभावात सध्या उतरता कल असून, पुढील काळात टप्प्याटप्प्याने पुरवठा वाढण्याची परिस्थिती दिसतेय. या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातबंदी सारखे निर्बंध पुरवठावाढीची समस्या आणखीतीव्र करण्यासाठी कारणीभूत ठरतील, असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे.