शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कांद्याच्या दरात घसरण

By admin | Updated: December 12, 2015 23:47 IST

तरीही किरकोळ भाव जास्तच

पूर्वा सावजी / गायत्री जेऊघाले ल्ल नाशिकडिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असताना दुसरीकडे अद्यापही किरकोळ विक्रीच्या दरात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग सरासरी दहा रुपये दराने कांदा विकत असताना ग्राहकांना मात्र तो सुमारे २५ रुपये किलो दरानेच खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील १५ दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण झालेली दिसून येते. म्हणजेच कांद्याचे आताचे भाव ९०० ते १२०० रुपये क्विंटल आहे. व्यापारीवर्ग शेतकऱ्यांकडून कांदा घेताना ९ ते १२ रुपये किलोने घेतो. हाच कांदाविक्रेते आणखी भाव वाढवून ग्राहकांना तो कांदा २० ते २५ रुपये किलोने मिळतो. यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांचेच नुकसान होते. नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात कांद्याचे वेगवेगळे भाव आढळून येतात. भद्रकाली परिसरात १८ रुपये किलोने कांदा मिळतो आणि तोच कांदा कॉलेजरोड, गंगापूररोड भागात २५ रुपये किलोने ग्राहकांपर्यंत पोहोचतो.सहा ते आठ महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडलेले होते. आज जो कांदा ९०० ते १२०० रुपये क्विंटलप्रमाणे मिळतो, तोच कांदा आधी सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात उपलब्ध होता, परंतु आता नवीन कांद्याचे उत्पन्न निघाल्याने कांद्याच्या दरात घसरण झालेली दिसते.