शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
3
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
4
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
5
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
6
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
7
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
8
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
9
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
10
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
11
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
12
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
14
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
15
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
16
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
17
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
18
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
19
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
20
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

चाळीतून कांदा थेट उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:41 AM

उन्हाळ कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतानाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

देवळा : उन्हाळ कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतानाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.देवळा तालुक्यातील अनेक शेतकºयांनी चाळीतील कांदा उकिरड्यावर टाकून दिला आहे. पोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचेदेखील बाजारभाव कोसळले आहेत, यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या मागे लागलेली साडेसाती संपायचे नाव घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीतील उन्हाळ कांद्याचे जागेवर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व पोळ कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत गतवर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन निघाल्यानंतर चांगला भाव मिळेल या मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. प्रत्येक शेतकºयाकडे स्वत:ची कांदा चाळ तयार झाली. यामुळे सर्व शेतकºयांनी कांदा चाळीत साठवणूक करण्यावर भर दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा