शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:41 IST

जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित: उत्पादन घटण्याची शक्यता

सध्या उन्हाळ कांदा लागवडीला सुरुवात झाली असून जळगाव नेऊर परिसरात तीन महिन्यांपासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तसेच दररोज पडणारे दव आणि धुके,पाऊस यामुळे कांदा जमिनीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अगोदरच लाल कांदा रोपे जमिनीतच सडल्याने व लागवड केलेला कांदाही दुषीत हवामानामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगाच्या विळख्यात सापडल्याने उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळ कांदा व लाल कांदा बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झशले आहेत. परतीच्या पावसापासून शेतकऱ्यांची सुरू झालेली साडेसाती अजूनही पाठ सोडायला तयार नसून आठ पंधरा दिवसातुन खराब होणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिक कष्टदायक होत चालले आहे.यावर्षी पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्रमी कांदा लागवड होणार असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महागडी बियाणे उपलब्ध करुन रोपे तयार केल्याने कांदा लागवडीला मजुरांची टंचाई भासत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा