शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:59 IST

शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देदादा भुसे : आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीची मागणी

मालेगाव : शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.गतवर्षी जानेवारी ते जूनपर्यंत भयानक दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. सुरुवातीला सर्व पिके जोमात असताना सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे बाजरी, कांदा, मका व इतर सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले. नदी काठावरील गावांमधील पिके अक्षरश: वाहून गेली. यात मुख्यत: मका, कांदा, डाळिंब, ऊस, द्राक्ष या नगदी पिकांचा समावेश होता.शासनाने व कृषी खात्याने लागवडनंतर उपरोक्त पिकांचे संरक्षण म्हणून पिकविमा काढण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे शेतकºयांनी पीकविमा उतरवला होता, तसेच बँकांनीदेखील कर्जदार शेतकºयांना कर्ज हप्ता पीक विमा रक्कमेसह भरून घेतला होता. सर्व पिके जोमात असताना सतत दोन महिने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्व पिके वाया गेली होती. नियमानुसार शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरले होते. नुकसानीनंतर कृषी व महसूल खाते तसेच विमा कंपन्यांने रीतसर पंचनामेही केले होते. मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा व इतर तालुक्यांतील डाळिंंब, कांदा व इतर फळ उत्पादक शेतकºयांनी पीकविमा प्रतिहेक्टरी ठरवून दिल्याप्रमाणे रक्कमेचा रोख भरणा केलेला होता. परंतु पीकविम्याचे नियमित हप्ते भरूनही विमा कंपन्यांनी शेतकºयांना नुकसानभरपाईची मदत न करता वाºयावर सोडून दिले आहे. काही ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हवामान खात्याच्या चुकीच्या नोंदी दाखवत त्या तारखांना पाऊस कमी पडला होता, असे दाखवून शेतकºयांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पीकविमाधारक शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार, प्रा. के. एन. आहिरे, देवा पाटील, शेखर पवार, कुंदन चव्हाण, प्रभाकर शेवाळे, अविनाश निकम, बाळासाहेब शिरसाठ, उदय राहुडे, दुर्गेश देवरे आदींनी केली आहे.शासनातर्फे पीकविमा भरपाई तत्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार धान्य उत्पादक शेतकºयांना पीकविमा भरपाई अदा करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास अवघा १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. शेतकºयांना येणाºया हंगामाच्या आत जरपीकविमा भरपाई मिळाली तर पुढील हंगामासाठी थोडेफार भांडवल उपलब्ध होईल.कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे मार्च महिन्यापासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामातील शेतमालाला बाजारपेठ मिळू शकली नाही. दर प्रचंड कोसळले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयाला मदतीचा हात देण्यासाठी तत्काळ पीकविमा भरपाई देणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMONEYपैसा