शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:59 IST

शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देदादा भुसे : आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीची मागणी

मालेगाव : शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.गतवर्षी जानेवारी ते जूनपर्यंत भयानक दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. सुरुवातीला सर्व पिके जोमात असताना सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे बाजरी, कांदा, मका व इतर सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले. नदी काठावरील गावांमधील पिके अक्षरश: वाहून गेली. यात मुख्यत: मका, कांदा, डाळिंब, ऊस, द्राक्ष या नगदी पिकांचा समावेश होता.शासनाने व कृषी खात्याने लागवडनंतर उपरोक्त पिकांचे संरक्षण म्हणून पिकविमा काढण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे शेतकºयांनी पीकविमा उतरवला होता, तसेच बँकांनीदेखील कर्जदार शेतकºयांना कर्ज हप्ता पीक विमा रक्कमेसह भरून घेतला होता. सर्व पिके जोमात असताना सतत दोन महिने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्व पिके वाया गेली होती. नियमानुसार शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरले होते. नुकसानीनंतर कृषी व महसूल खाते तसेच विमा कंपन्यांने रीतसर पंचनामेही केले होते. मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा व इतर तालुक्यांतील डाळिंंब, कांदा व इतर फळ उत्पादक शेतकºयांनी पीकविमा प्रतिहेक्टरी ठरवून दिल्याप्रमाणे रक्कमेचा रोख भरणा केलेला होता. परंतु पीकविम्याचे नियमित हप्ते भरूनही विमा कंपन्यांनी शेतकºयांना नुकसानभरपाईची मदत न करता वाºयावर सोडून दिले आहे. काही ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हवामान खात्याच्या चुकीच्या नोंदी दाखवत त्या तारखांना पाऊस कमी पडला होता, असे दाखवून शेतकºयांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पीकविमाधारक शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार, प्रा. के. एन. आहिरे, देवा पाटील, शेखर पवार, कुंदन चव्हाण, प्रभाकर शेवाळे, अविनाश निकम, बाळासाहेब शिरसाठ, उदय राहुडे, दुर्गेश देवरे आदींनी केली आहे.शासनातर्फे पीकविमा भरपाई तत्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार धान्य उत्पादक शेतकºयांना पीकविमा भरपाई अदा करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास अवघा १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. शेतकºयांना येणाºया हंगामाच्या आत जरपीकविमा भरपाई मिळाली तर पुढील हंगामासाठी थोडेफार भांडवल उपलब्ध होईल.कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे मार्च महिन्यापासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामातील शेतमालाला बाजारपेठ मिळू शकली नाही. दर प्रचंड कोसळले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयाला मदतीचा हात देण्यासाठी तत्काळ पीकविमा भरपाई देणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMONEYपैसा