शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

जिल्ह्यात अवघ्या २४ दिवसांत कोरोनाचे एक हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:14 IST

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्चला, तर पहिला बळी गतवर्षी ८ एप्रिलला आढळला होता. मात्र, त्यानंतरच्या  प्रारंभीच्या टप्प्यात कोरोना  रुग्णसंख्या वाढीसह बळींचा वेग तुलनेने खूपच कमी होता. त्यामुळेच प्रारंभीच्या एक हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल पाच महिन्यांहून अधिक  कालावधी लागला होता.  गतवर्षी १० सप्टेंबरला कोरोना बळींनी एक हजारांचा टप्पा ओलांडला. त्यावेळीदेखील कोराेना गतवर्षातील सर्वोच्च पातळीवर होता. त्यानंतरचा पुढील सहा महिन्यांच्या काळातही कोरोना बळींमध्ये खूप वेगाने वाढ झाली नव्हती. मात्र, मार्चपासून बळींच्या संख्येत झालेली वाढ चिंतेत भर घालणारी ठरली आहे.मागील हजार बळी सर्वाधिक वेगानेजानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या बळींचा वेग फारसा वाढला नव्हता. मात्र, मार्चपासून पुन्हा वेग वाढल्याने तिसऱ्या हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी २० एप्रिलपर्यंतचा काळ जावा लागला. म्हणजे दोन हजारपुढील हजार बळींसाठी सुमारे साडेतीन महिन्यांचा १०० दिवसांहून अधिक काळ लागला होता, तर तीन हजारनंतरच्या चार हजार बळींपर्यंतचा हजार बळींचा टप्पा गुरुवारी (दि.१३ मे) अवघ्या २४ दिवसात गाठला गेल्याने बळींचा वेग चौपटीहून अधिक झाल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यांनी पुढचे हजार बळी गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले होते. सप्टेंबरमध्ये एक हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तर मृत्युदर खूपच कमी झाला होता. त्यामुळेच कोरोनाच्या दोन हजार बळींसाठी त्यानंतर तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला होता. ७ जानेवारीला कोरोनाचे दोन हजार बळी पूर्ण झाले होते. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू