शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

जिल्ह्यात अवघ्या २४ दिवसांत कोरोनाचे एक हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:14 IST

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्चला, तर पहिला बळी गतवर्षी ८ एप्रिलला आढळला होता. मात्र, त्यानंतरच्या  प्रारंभीच्या टप्प्यात कोरोना  रुग्णसंख्या वाढीसह बळींचा वेग तुलनेने खूपच कमी होता. त्यामुळेच प्रारंभीच्या एक हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल पाच महिन्यांहून अधिक  कालावधी लागला होता.  गतवर्षी १० सप्टेंबरला कोरोना बळींनी एक हजारांचा टप्पा ओलांडला. त्यावेळीदेखील कोराेना गतवर्षातील सर्वोच्च पातळीवर होता. त्यानंतरचा पुढील सहा महिन्यांच्या काळातही कोरोना बळींमध्ये खूप वेगाने वाढ झाली नव्हती. मात्र, मार्चपासून बळींच्या संख्येत झालेली वाढ चिंतेत भर घालणारी ठरली आहे.मागील हजार बळी सर्वाधिक वेगानेजानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या बळींचा वेग फारसा वाढला नव्हता. मात्र, मार्चपासून पुन्हा वेग वाढल्याने तिसऱ्या हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी २० एप्रिलपर्यंतचा काळ जावा लागला. म्हणजे दोन हजारपुढील हजार बळींसाठी सुमारे साडेतीन महिन्यांचा १०० दिवसांहून अधिक काळ लागला होता, तर तीन हजारनंतरच्या चार हजार बळींपर्यंतचा हजार बळींचा टप्पा गुरुवारी (दि.१३ मे) अवघ्या २४ दिवसात गाठला गेल्याने बळींचा वेग चौपटीहून अधिक झाल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यांनी पुढचे हजार बळी गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले होते. सप्टेंबरमध्ये एक हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तर मृत्युदर खूपच कमी झाला होता. त्यामुळेच कोरोनाच्या दोन हजार बळींसाठी त्यानंतर तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला होता. ७ जानेवारीला कोरोनाचे दोन हजार बळी पूर्ण झाले होते. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू