शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी फाट्यानजीक अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:31 IST

नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पाडळी देशमुख ते विल्होळी दरम्यान सुरू असलेली अपघातांची मालिका कधी खंडित होणार असा प्रश्न येथील नागरिकात उपस्थित होत आहे.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे एका हॉटेलजवळ नाशिकहून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या टेम्पोने (एमएच०५ डीके १०३४) समोरून चाललेल्या कंटेनरला (एमएच ४६ एएफ २०८३) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश दुलाल शेख (४२) व गौतम अथुनी हजमा (४०) दोघेही रा. उल्हासनगर, मुंबई हे गंभीर जखमी झाले. वाडीवºहे पोलीस ठाण्याचे कर्मचारी मौले, परदेशी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातात जखमी झालेल्यांना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल केले. दरम्यान, राजेश दुलाल शेख याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पाडळी फाटा ते विल्होळी दरम्यान गेल्या दोन महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची व वाहनांची वर्दळ कमी असतानादेखील चार ते पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलीही वाहने धावत नसताना महिन्यामध्ये चार ते पाच अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांची मालिका अशीच सुरू राहणार की खंडित होणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. व्हीटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू