शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

महाविद्यालयात शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 01:07 IST

नाशिक- विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा निर्णय होता, त्यास सुरू झालेल्या विरोधानंतर शासनाला देखील चुक उमगली असून त्यांनी अखेरीस अन्य आदेश काढून महाविद्यालयात आवश्यकतेनुसार कर्मचारी बोलविण्यास मुभा दिला आहे.

ठळक मुद्देशासनाचे स्पष्टीकरण: संभ्रम दुर होण्याची शक्यता

नाशिक- विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा निर्णय होता, त्यास सुरू झालेल्या विरोधानंतर शासनाला देखील चुक उमगली असून त्यांनी अखेरीस अन्य आदेश काढून महाविद्यालयात आवश्यकतेनुसार कर्मचारी बोलविण्यास मुभा दिला आहे.सोमवारी (दि.२१) कार्यसन अधिकारी प्रविणकुमार पवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून यापूर्वीच्या १८ सप्टेंबरच्या आदेशाला अनुषंगून स्पष्टीकरण देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात गरजेनुसारपरीक्षेसाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आवश्यक असले तरी ही उपस्थिती आॅनलाईन किंवा प्रत्यक्ष जशी शक्य आहे, तशी उपस्थिती असावी. तसेच गरजेनुसार उपस्थिती असावी असेही नमूद करण्यात आले आहे.राज्यााचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत रविवारी (दि.२०) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी मुक्त विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. महाविद्यालयांनी अंतिम विषयाच्यापरीक्षा घेण्याची तयारी सुरू केल्यानंतर शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचे आदेश राज्यशासनाने जारी केले. त्या अनुषंघाने सर्व विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांनी कर्मचा-यांना शंभर टक्के शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती राहावी यासाठी शासनाच्या आदेशाच्या आधारे परिपत्रके काढली होती. मात्र, ठिकठिकाणी प्राध्यापक संघटनांनी विरोध सुरू केला होता. मुंबईसह अनेक ठिकाणी अद्याप प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत.तसेच नाशिक, पुणे आणि अन्यही ठिकाणी कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात शंभर टक्के उपस्थितीच्या आदेशामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.उदय सामंत यांना यासंदर्भात रविवारी विचारणा केल्यानंतर शासनाने शंभर टक्के उपस्थितीचा आदेश हा केवळ आधार म्हणून घेतला पाहिजे आणि आवश्यकतेनुसार कुलगुरूंनी शिक्षक- शिक्षकेतरांना बोलविले पाहिजे असेसांगितले. तथापि, शासनाच्या आदेशातच शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचा उल्लेख होता. यासंदर्भातील माहिती लक्षात आल्यानंतर सामंत यांनी तातडीने सुधारीत आदेश काढून गरजेनुसार शिक्षक- शिक्षकेतरांना बोलविण्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा