शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख विद्यार्थ्यांना ‘मुक्त’ची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:15 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर हे उपस्थित राहणार आहे. यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांचा समावेश असून, या समारंभात एक लाख १७ हजार ३६९ विद्यार्थ्यांना पदवी, १५ हजार ६३२ पदविका, १८ हजार ३१३ पदव्युत्तर पदवी, ८४ हजार पदव्युत्तर पदवी, ११ एम फील, तर ३१ पीएचडी विद्यार्थी पदवीग्रहण करणार आहेत. यंदा पदवी, पदविका घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये पुरुषांची संख्या ९४ हजार २८१, तर महिलांची संख्या ६० हजार १५९ इतकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पुरुष विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी वेगवेगळे असलेतरी महिलांचे ग्रामीण भागातील प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांत बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे चित्र आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावर्षी पदवी घेणाºया पुरुषांचे प्रमाण ५५, तर महिलांचे प्रमाण ४५ टक्के इतकेच आहे. स्त्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिलांची ९ हजार ५७६ संख्या ही नाशिक विभागात आहे. त्याखालोखाल ९ हजार ३२८ नांदेड आणि ८ हजार ३९० अमरावती विभागातील महिलांची संख्या आहे. शहरी भागातील विद्यार्थी ४९ हजार असून, उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यापीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थी संख्या मिळविली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवी घेणाºया एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख २ हजार ९८ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे, तर आदिवासी भागातील १ हजार ५१२ विद्यार्थी आहेत. डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित केल्याने सध्या सर्व शिक्षणक्र मांचे निकाल वेळेत लावणे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश अतकरे, जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रमुख संतोष साबळे आणि उपकुलसचिव जयवंत खडताळे उपस्थित होते.यावर्षी विद्यार्थीसंख्येत वाढगेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ६० वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल एक हजार ३१४ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण करीत असून, त्यात सर्वाधिक ५०९ व्यक्ती मुंबईतील आणि २१४ विभागांतील आहेत. बी.एड.चे एक हजार ५०३ विद्यार्थी पदवी ग्रहण करीत असल्याचेही कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक देता याव्यात तसेच पारदर्शकता वाढावी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर जास्त भर दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ