शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दीड लाख विद्यार्थ्यांना ‘मुक्त’ची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:15 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर हे उपस्थित राहणार आहे. यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांचा समावेश असून, या समारंभात एक लाख १७ हजार ३६९ विद्यार्थ्यांना पदवी, १५ हजार ६३२ पदविका, १८ हजार ३१३ पदव्युत्तर पदवी, ८४ हजार पदव्युत्तर पदवी, ११ एम फील, तर ३१ पीएचडी विद्यार्थी पदवीग्रहण करणार आहेत. यंदा पदवी, पदविका घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये पुरुषांची संख्या ९४ हजार २८१, तर महिलांची संख्या ६० हजार १५९ इतकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पुरुष विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी वेगवेगळे असलेतरी महिलांचे ग्रामीण भागातील प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांत बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे चित्र आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावर्षी पदवी घेणाºया पुरुषांचे प्रमाण ५५, तर महिलांचे प्रमाण ४५ टक्के इतकेच आहे. स्त्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिलांची ९ हजार ५७६ संख्या ही नाशिक विभागात आहे. त्याखालोखाल ९ हजार ३२८ नांदेड आणि ८ हजार ३९० अमरावती विभागातील महिलांची संख्या आहे. शहरी भागातील विद्यार्थी ४९ हजार असून, उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यापीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थी संख्या मिळविली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवी घेणाºया एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख २ हजार ९८ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे, तर आदिवासी भागातील १ हजार ५१२ विद्यार्थी आहेत. डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित केल्याने सध्या सर्व शिक्षणक्र मांचे निकाल वेळेत लावणे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश अतकरे, जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रमुख संतोष साबळे आणि उपकुलसचिव जयवंत खडताळे उपस्थित होते.यावर्षी विद्यार्थीसंख्येत वाढगेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ६० वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल एक हजार ३१४ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण करीत असून, त्यात सर्वाधिक ५०९ व्यक्ती मुंबईतील आणि २१४ विभागांतील आहेत. बी.एड.चे एक हजार ५०३ विद्यार्थी पदवी ग्रहण करीत असल्याचेही कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक देता याव्यात तसेच पारदर्शकता वाढावी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर जास्त भर दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ