शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

पाथरे खुर्द शिवारात एक एकर ऊस जळून खाक

By admin | Updated: March 26, 2016 23:02 IST

पाथरे खुर्द शिवारात एक एकर ऊस जळून खाक

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.पाथरे खुर्द शिवारात निर्मलाबाई ज्ञानदेव चिने यांचे गट नंबर ३७६ मध्ये एक एकर उसाचे पीक होते. या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. खांबांवरील तारा लोंबकळल्याने त्या अतिशय खालून गेल्या आहेत. या वीजवाहक तारांमध्ये वाऱ्यामुळे घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या पिकावर पडल्याने चिपाडाने पेट घेतल्याचे चिने यांनी सांगितले. दुपारी उन्हाच्या उष्णतेमुळे व वाऱ्याने उसाचे क्षणार्धात पेटले. उसाने पेट घेतल्याचे पाहून रवि गावडे, राजेंद्र दवंगे, दादासाहेब दवंगे, नामदेव गावडे, विकास चिने, कृष्णा चिने यांनी संबंधित शेतकऱ्याशी संपर्क साधला. तोपर्यंत उसाने चांगलाच पेट घेतला होता. वीजवाहिन्या लोंबकळत असल्याची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली होती, असे चिने यांनी सांगितले. तथापि, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चिने यांनी केला आहे. वीज वितरण कंपनीने वेळीच खबरदारी घेतली असती तर उसाचे पीक जळाले नसते ्रअसा दावाही त्यांनी केला आहे. तलाठी के.एम. परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. (वार्ताहर)