शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कांदा अनुदानापासून नायगाव खोऱ्यातील शेतकरी वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 14:12 IST

नायगाव: शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदती बरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने ...

नायगाव: शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदती बरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने जाहीर केलेले अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम डोमाडे यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी मदतीची घोषणा करून बळीराजाला दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न केला.मात्र जाहीर केलेली मदत अजुनही शेतकºयांना मिळाली नाही. तसेच प्रतिकुल परिस्थतीत पिकविलेल्या शेती मालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना दुष्काळी मदती पाठोपाठ कांदा पिकास प्रती क्विंटल दोनशे रूपये अनुदान जाहीर केले. मात्र सहा महिने होऊनही शेतकरी अजुनही या अनुदानाच्या प्रतिक्षेतच आहे. यंदा भीषण दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चा-याच्या टंचाईमुळे हैराण झाले आहे. वर्षभर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दुष्काळी मदत व कांदा अनुदानाची रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या शेतकºयांना शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर बँक खात्यावर जमा करण्याची मागणी देशवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम डोमाडे यांच्यासह नायगाव खो-यातील शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक