शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पावसाने दडी मारल्याने अधिकारीही चिंतित

By admin | Updated: July 2, 2014 00:27 IST

पावसाने दडी मारल्याने अधिकारीही चिंतित

 

त्र्यंबकेश्वर : पावसाळा सुरू होऊन तब्बल महिना उलटूनही पाऊस येण्याचे नाव घेत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, त्र्यंबक नगरपालिकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.बेझे धरण कार्यान्वित होईपर्यंत किमान एक वर्ष पाण्याचा त्रास त्र्यंबककरांना सहन करावा लागणार आहे. यावर्षी नमनालाच पावसाने हूल दिल्याने पाण्यासाठी हाल होत आहे. गावातील विविध नागरी वस्तीत कमी जास्त दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात-देखील टंचाईबाबत मिटिंग बोलविण्यात आली होती. तसेच टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार निर्मला गावित यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आदिंची हरसूल येथे बैठक बोलविली आहे, तर त्र्यंबक नगरपालिकेनेदेखील सोमवारी (दि. ३०) एका अनौपचारिक बैठकीत त्र्यंबक नगरपालिका हद्दीत संभाव्य टंचाईसंदर्भात विचारविनिमय केला. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी सद्यस्थिती व संभाव्य टंचाई परिस्थितीची नगरसेवकांना कल्पना दिली. या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचीही माहिती दिली. यावर नगरसेवकांनीदेखील काही आवश्यक सूचना केल्या. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिका सज्ज असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या ३१ जुलैपर्यंत अंबोली धरणात पाणी मिळेल आणि सध्याचा पाणीपुरवठा ज्या परिस्थितीत होत आहे. त्या कुठलाही फरक केला जाणार नसल्याचे नागरे व पाणीपुरवठाप्रमुख बाळासाहेब फसाळे यांनी सांगितले. म्हणूनच ग्रामीण भागासह नगरपालिका क्षेत्र, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा जणू धसका घेतला आहे. या अनौचारिक बैठकीत सुनील अडसरे, यशोदा अडसरे, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, यशवंत भोये, मनोज काण्णव, प्रशांत जुन्नरे, फसाळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)